Wednesday , March 4 2026
Breaking News

के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय साहित्य महोत्सव थाटामाटात संपन्न

Spread the love

 

राष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे विविध स्पर्धांचे आयोजन; सर्वसाधारण विजेते पद जीआय महाविद्यालय बेळगाव

बेळगाव : येथील के.एल.ई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयामध्ये कन्नड, हिंदी आणि इंग्रेजी भाषा विभागाच्या वतीने राष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य महोत्सवाचा प्रमुख विषय भविष्याची प्रतिध्वनि: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि साहित्य असा होता. या साहित्य महोत्सवाला उद्घाटक म्हणून कर्नाटक राज्याचे माजी विधान परिषद सदस्य आणि कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. महांतेश कवटगीमठ उपस्थित होते. व्यासपीठावर या साहित्य महोत्सवाला संसाधन व्यक्ति म्हणून बेंगलरु येथील ख्राईस्ट विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागाचे डॉ. सी. बालकृष्णन, कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख प्रो. अर्जुन चव्हाण आणि विजयवाणी कन्नड वृत्तपत्राचे पत्रकार श्री. महेश विजापुरे मार्गदर्शकच्या रुपात उपस्थित होते. इंग्रजी, कन्नड आणि हिंदी विभागांद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या द्वीदिवसीय महोत्सवाचा उद्घाटन समारंभ दीपप्रज्वलनाने झाला.
यावेळी म्हणून कर्नाटक राज्याचे माजी विधान परिषद सदस्य आणि कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. महांतेश कवटगीमठ म्हणाले की, साहित्यिक महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि सांस्कृतिक जागरूकता जोपासावी. एआय तंत्रज्ञानाने आकार घेतलेल्या युगातही साहित्य मानवी विचारांचे कालातीत प्रतिबिंब राहिले आहे. आजच्या काळातील सर्वात परिवर्तनशील तंत्रज्ञानापैकी एक एआय आहे. एआयमूळे मानवी जीवन बदलतत आहे. विद्यार्थ्यांना एआयसारखे तंत्रज्ञान अवगत करुन आपला व्यक्तिमत्व विकास करावा. .
या साहित्यिक महोत्सवाचे प्रमुख पाहुणे इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ बेंगळरु येथील ख्राइस्ट विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सी. बालकृष्णन, यांनी भविष्याची प्रतिध्वनि: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि साहित्य या विषयावर एक सविस्तर मत मांडले. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता सर्जनशीलता आणि कथाकथनाची पुनर्परिभाषा कशी करत आहे यावर चर्चा केली आणि विद्यार्थ्यांना मानवी कल्पनाशक्तीची जागा न घेता साहित्यिक सर्जनशीलतेला मदत करू शकणारे तंत्रज्ञान स्वीकारण्यास प्रोत्साहित केले.

यावेळी विजयवाणी कन्नड वृत्तपत्राचे पत्रकार श्री. महेश विजापुरे म्हणाले की, साहित्य, सर्जनशीलता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा छेदनबिंदू शोधण्याच्या उद्देशाने भाषा व आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालणे खूप अवघड व आव्हानात्मक आहे. मानव संपूर्णपणे एआयवर अवलंबून राहू शकत नाही. एआयची माहिती कोणती बरोबर आणि चूक हे मानवाने ठरवावे लागेल.
या साहित्य महोत्सवाचे हिंदी विषयाचे प्रमुख पाहुणे कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख म्हणाले की, एआयच्या पाऊलखुणा महाभारत आणि रामायणसारख्या महाकाव्यात आढळतात. आज एआय तंत्रज्ञान भावी पीढीसाठी वरदानच्या रुपात प्राप्ट झाले आहे. एआयमुळे मानवी जीवन सुलभ झाले आहे. एआयचा वापर शिक्षण, आरोग्य, वाहतूक रोजगार, कृषी आणि विविध क्षेत्रात वाढत आहे. तसेच एआयमुळे काही समस्याही निर्माण झाल्या आहेत.
प्राचार्य डॉ. एच. एस. मेलिनमनी यांनी अध्यक्षीय भाषणात भाषा विभागाचे साहित्य आणि तंत्रज्ञानाचे मिश्रण करणारा महोत्सव आयोजित केल्याबद्दल कौतुक केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विश्लेषणात्मक आणि सर्जनशील कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळते. अशा कार्यक्रमांमुळे कला, बुद्धिमत्ता आणि नवोपक्रमाद्वारे समग्र विकास होतो यावर त्यांनी भर दिला.
कार्यक्रमाची सुरुवात कु. रोहिणी हिच्या स्वागतगीताने झाली. डॉ. एच. एम. चन्नापगोळ यांनी स्वागत भाषण केले आणि उद्घाटन समारंभात उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केले. डॉ. नंदन कटांबळे यांनी आजच्या उद्घाटक अध्यक्ष श्री. महांतेश कवटगीमठ, आणि डॉ. सी. बालकृष्णन यांची ओळख करून दिली.
या साहित्य महोत्सवाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. श्रद्धा पाटील यांनी केले. या साहित्य महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. शशिकांत कोन्नूर, प्रा.सी.एस. पाटील, प्रा. सरिका पाटील, प्रा.श्रुती रेबण्णावर डॉ. सुजयकुमार चोळीन, कन्नड विभाग प्रमुख डॉ. एम.एच. चन्नापगोळ, डॉ. पांडुरंग गणेगेर, हिंदी विभाग प्रमुख डॉ. अर्जुन कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या साहित्य महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी कविता स्पर्धा, चित्रकला, एकपात्री अभिनय, पथ नाट्य, नृत्य, वाद्य संगीत स्पर्ध, फ़ॅशन शो, कवितेवर आधारित चित्र बनवणे, पोस्टर बनवणे, फोटोग्राफी, रिल बनवणे अशा विविध स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. या मध्ये विविध महाविद्यालयाच्या 510 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *