खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील व अतिपावसाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिगुळे येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधीचे तसेच संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. चिगुळे मराठी शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग चालतात. मात्र शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाल्याने केवळ तीनच वर्गात सर्व …
Read More »हलशीवाडी येथील भव्य क्रिकेट स्पर्धेचा चषक अनावरण सोहळा उत्साहात
बेळगाव : शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात खूप चांगले क्रीडापटू तयार होत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागात अधिक प्रमाणात स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी महापौर विजय मोरे यांनी केले. हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित आणि साहेब फौंडेशन पुरस्कृत भव्य क्रिकेट स्पर्धेला 5 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या …
Read More »चण खाऊ लोंखडाच म्हणत लोखंडावर घाव घालून श्रम गाळणारे श्रमिक खानापूरात दाखल
खानापूर (प्रतिनिधी) : कशासाठी पोटासाठी म्हणत पाठीवर संसार घेऊन महाराष्ट्रातून खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवर दाखल झालेल्या हात मजुर लोखंडापासून विळा, कोयता, कुदळ, कुर्हाड तयार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवरील रस्त्याच्या कडेला ठाण मा़ंडून आपला उद्योग करत आहेत. रोज लोखंडापासून विविध धातू तयार …
Read More »खानापूर बंद 100 टक्के यशस्वी : मोर्चाने निवेदन
खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमधील अनेक धंदे आणि व्यवसायांमध्ये परप्रांतीयांनी अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेला ‘खानापूर बंद’ 100 टक्के यशस्वी झाला. बंदसह व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. खानापूर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये परप्रांतीयांनी जाळे पसरवून स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यवसायांवर अतिक्रमण सुरू केले …
Read More »खानापूर-कणकुंबी-चोर्ला रस्त्याची दुरावस्था
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कणकुंबी-चोर्ला या 30 किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्त्याची दुरावस्था झाली. याकडे लोकप्रतिनिधीचे तसेच संबंधित खात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे खानापूर-जांबोटी-कणकुंबी-चोर्ला या मार्गावरून प्रवाशाना प्रवास करताना खड्ड्याशी सामना करावा लागतो आहे. या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून खड्डे बुजविलेच नाही. त्यामुळे वाहनधारकांना …
Read More »बंकी येथे अन्नातून विषबाधा झालेल्या 11 जणांपैकी एकाच मृत्यू
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बंकीबसरीकट्टी गावातील एका कुटुंबाला एम. के. हुबळी येथे लग्न समारंभात जेवण करून घरी आल्यानंतर रात्री उलटी जुलाब झाल्याने 11 जणांना नंदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या सर्वाना अन्नातून विषबाधा झालेला होता. यामध्ये तुषार महमद जमादार (वय 12) याचा गुरुवारी मृत्यू झाला. तो येथील …
Read More »गणेबैलजवळ टोलनाका स्थानिक वाहन चालकाना भुर्दंड होईल का?
खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव लोंढा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या महामार्गाच्या चौपदीकरणाने सामान्य जनतेला मेटाकुटीस आणले आहे. खानापूर तालुक्यातील प्रभनगरपासून ते लोंढ्यापर्यंत अनेक गावच्या शेतकरीवर्गाची जमिन या महामार्गाच्या चौपदीकरणाने काढून घेतली आहे. त्याचा मोबदला कमी प्रमाणात दिला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी वर्गाने कोर्टात धावून जमिनीची रक्कम वाढवून देण्याची …
Read More »पराभवाचे खापर जारकीहोळींच्या माथ्यावर….!
संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव विधान परिषद निवडणुक हार-जीतचा फैसला जारकीहोळी बंधुंवर असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाने पराजयाची खापर जारकीहोळी बंधुंवर फोडण्याचा इरादा पक्का केलेला दिसत आहे. बेळगांव विधानपरिषदची निवडणूक तशी तिरंगी अत्यंत चुरशीने होणार आहे. निवडणुकीत भाजपाने महांतेश कवठगीमठ यांना तर काँग्रेसने चन्नराज हट्टीहोळी यांना आखाड्यात उतरविले …
Read More »खानापूर युवा समितीच्या पाठपुराव्याला यश
बेळगाव : १६ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती खानापूर यांच्यावतीने डेपो मॅनेजर श्री. आनंद शिरगुप्पीकर यांना निवेदन देण्यात आले होते की, खानापूर ते नागरगाळी हि बस संध्याकाळी ५.३० या नेहमीच्या वेळेवर सोडण्यात यावी, म्हणजे विद्यार्थ्यांचे वर्ग चुकणार नाहीत व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण …
Read More »खानापूर पशुखात्याच्या मुख्यमंत्री अमृत योजनाचा निकाल लांबणीवर
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पशु खात्याच्यावतीने सन 2020-21 सालामध्ये मुख्यमंत्री अमृत योजना निकाल लांबणीवर पडल्याची चर्चा तालुक्यातून होत आहे. पशुखात्याकडून मुख्यमंत्री अमृत योजनेसाठी आलेल्या अर्जाची छाननी करून तालुका लोकप्रतिनिधींच्याकडे निवड करण्यासाठी पाठविण्यात आले असून अजूनही मुख्यमंत्री अमृत योजनेचा निकाल अद्याप झालेला नाही. मात्र शेतकरीवर्गातून निवडीकडे लक्ष लागून राहिले आहे. …
Read More »