Thursday , September 19 2024
Breaking News

महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यासाठी 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट, एनडीआरएफच्या दोन तुकड्या आजपासून तैनात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 25 फूट 8 इंचावर पोहोचली आहे. राजाराम बंधाराही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 15 बंधारे पाण्याखाली …

Read More »

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर (जिमाका): जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहीम गतिमान करा. यासाठी बोगस डॉक्टरांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून बोगस डॉक्टरांवर कारवाई करा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. जिल्हा दक्षता पथक (पीसीपीएनडीटी) बैठक आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. …

Read More »

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात मुसळधार पाऊस; पंचगंगेची पातळी २४.५ फुटांवर

कोल्‍हापूर : जिल्ह्यात साेमवार (दि. ४) पासून पावसाचा जोर वाढला. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत २४ तासात १० फुटाने वाढ झाली आहे. आज (मंगळवार) सकाळी आठ वाजेपर्यंत पाण्याची पातळी 24.5 फुटावर गेली असून, जिल्ह्यातील १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-खारेपाटण मार्गावर …

Read More »

कोकणात जोरदार पाऊस, जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

रत्नागिरी : राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. कोकणात देखील पावसाने जोर धरला असून गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने गिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे. तर कोकणातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. पावासाचा जोर असा कायम …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला बेळगावचा किस्सा; भुजबळांमुळे रहावे लागले ४० दिवस जेलमध्ये

मुंबई : विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली लढाई शिंदे सरकारने जिंकली आणि भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतांनी अध्यक्षपदी विराजमान झाले. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात अभिनंदन प्रस्तावावर जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी राजकीय प्रवास आणि कौटुंबिक माहिती देत मला कोणत्याही पदाची लालसा नसल्याचं त्यांनी म्हटले. …

Read More »

अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड!

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. २८७ आमदारांपैकी १६४ मते शिंदे सरकार मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य …

Read More »

हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा! : उद्धव ठाकरे

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केलं आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आज त्यांनी शिवसेना भवनमध्ये राज्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे या …

Read More »

शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला!

मुंबई : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकार 6 महिन्यात कोसळेल, मध्यवर्ती निवडणूकीला तयार राहा : शरद पवार

मुंबई : राज्यात सध्या आलेलं सरकार सहा महिन्यात कोसळू शकते, त्यामुळे मध्यवर्ती निवडणूकीच्या तयारीला लागा, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिली आहे. शिंदे सरकारची सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. आमदारांना मार्गदर्शन …

Read More »

एकनाथ शिंदेंनी पहिली लढाई जिंकली! आजचं कामकाज स्थगित; उद्या बहुमत चाचणीची परीक्षा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारनं आज विधिमंडळ अधिवेशनात पहिल्या दिवशी पहिली लढाई जिंकली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांची मोठ्या फरकानं निवड झाली. यामुळं उद्याच्या बहुमत चाचणीसाठी देखील शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. आज पहिल्या दिवशीचं कामकाज विधानसभा अध्यक्ष निवड, त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावानंतर स्थगित करण्यात …

Read More »