Friday , December 19 2025
Breaking News

बेळगाव

सरसकट कर्जमाफीसाठी बेळगावात विणकरांचे आंदोलन

  बेळगाव : संपूर्ण कर्नाटकात कर्जाच्या बोजामुळे 43 विणकरांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन विणकर संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यभरातील विणकर विविध कारणांमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत, शासनाच्या योजना विणकरांपर्यंत पोहोचत नसल्याने ते वंचित आहेत, विणकरांना असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा …

Read More »

आंबेवाडीत जनावरांना लाळखुरकूत लसीकरण

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील आंबेवाडी गावामध्ये जनावरांना घरोघरी जाऊन लाळखुरकुत लसीकरण करण्यात आले. आंबेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ता राहुल भातकांडे यांनी विशेष परिश्रम घेत ही लसीकरण मोहीम यशस्वी केली. यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप हन्नूरकर यांनी आंबेवाडी गावातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना लाळखुरकत रोगांची लक्षणे व …

Read More »

शहापूर पोलीस निरीक्षकपदी सिम्मनी यांची नियुक्ती

  बेळगाव : शहापूर पोलीस निरीक्षक पदी एस एस सिम्मनी यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे. मावळते पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांची अन्यत्र बदली झाली आहे. सिम्मनी यांनी या अगोदर बेळगाव शहरात मार्केट पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्य केले होते. त्यावेळी त्या भागात शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

Read More »

पालकमंत्री सतीश जारकीहोळीना धमकीपत्र देणाऱ्याला कठोर शिक्षा द्या

  दलित संघटनांचे आंदोलन: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना धमकीपत्र देणाऱ्या विरोधात कठोर शिक्षा व्हावी. शिवाय याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी विविध दलित संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दोन दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तींनी पत्र पाठवून जिल्हा पालकमंत्री सतीश जरकीहोळी यांना थेट धमकी दिली आहे. एवढी …

Read More »

संघटितपणे संविधानाचा हक्क मिळवणे चूकीचे कसे? : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बेळगावातील राष्ट्रीय समावेश मेळाव्यात सत्कार स्विकाताना व्यक्त मत बेळगाव (प्रतिनिधी) : देशातील सर्व समाज एक सारखेच असून, आजपर्यंत आम्हीं कधीही जातीभेद केला नाही. सर्व समाजाला बरोबर घेऊनच चाललो आहोत. सरकार संविधानाच्या चौकटीतच सर्व समाजाना एकच न्याय दिला जाईल, असे सांगत कोणत्याही समाजाने संघटिपणे हक्क मागितला तर त्यात चुकीचे काय …

Read More »

दिल्ली -बेळगाव विमानसेवा 5 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू

  बेळगाव : वर्षभरापासून बंद पडलेली दिल्ली -बेळगांव विमानसेवा आता पुन्हा 5 ऑक्टोबर पासून नव्याने सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे बेळगाव ते मुंबई ही विमानसेवा येत्या 15 ऑक्टोबर पासून बेळगावकरांच्या सेवेत असणार आहे. इंडिगो विमान कंपनीने बेळगाव ते दिल्ली विमानसेवा सुरू केली असून या कंपनीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नवी दिल्ली ते …

Read More »

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या पुढाकाराने प्लास्टिक मुक्तीचे अभियान

  बेळगाव : स्वच्छ भारत अभियांनातर्गत ‘ऑपरेशन मदत’ ग्रूप या संस्थेच्या सहकार्याने कॅन्टोन्मेंट शाळेने पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज आहे ओळखून, शाळेमध्ये प्लास्टिक मुक्तीचे अभियान सुरू केले आहे. संपूर्ण जग हे दिवसेंदिवस प्लास्टिकच्या विळख्यात जखडले जात आहे. त्याच्या दुष्परिणामाची कल्पना विद्यार्थ्यांना बाल वयापासूनच व्हावी व पर्यावरण संवर्धनात विद्यार्थ्यांचाही सहभाग असावा …

Read More »

शब्दगंध कवी मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी “शब्दगंध काव्य लेखन स्पर्धेचे” आयोजन

  वर्धापन दिनानिमित्त माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा दोन गटाकरिता आयोजन बेळगाव : बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळ गेली ३३ वर्षे मराठी कविता आणि कवींसाठी कार्यरत आहे. मंडळातर्फे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून बेळगावातील काव्य परंपरा समृद्ध करण्याचे कार्य करते आहे. ३३व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शब्दगंध काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

भारत विकास परिषदेची आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात

  बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा रविवारी अपूर्व उत्साहात पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून विचारवंत किशोर काकडे उपस्थित होते. व्यासपीठावर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. व्ही. एन्. जोशी, विभागीय सचिव पांडुरंग नायक, कर्नाटक प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर, संयोजक डाॅ. जे. जी. नाईक, बेळगांव …

Read More »

समाजातील चांगल्या कामांचे कौतुक प्राधान्याने करा : गणेश शिंदे

  संजीवनी फौंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त व्याख्यान बेळगाव : समाजात खूप काही चांगली कामे सुरु असतात, खूप जण समाज बदलासाठी प्रयत्न करत असतात, मात्र त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या कमी आहे. समाजात जे चांगले आहे, ते चांगले मानून त्यांना पाठिंबा द्या. संत तुकाराम यांनी शब्द हे शस्त्र आहेत, त्या शब्दांचा वापर …

Read More »