Sunday , December 7 2025
Breaking News

कोल्हापूर

प्रभावी उपाययोजना राबवून पंचगंगा प्रदुषण प्रश्न कायमस्वरुपी सोडवा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (जिमाका):  प्रभावी उपाययोजना राबवून पंचगंगा प्रदूषणाचा गंभीर प्रश्न कायमस्वरुपी सोडवा, अशा सूचना देवून यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील …

Read More »

राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  कोल्हापूर (जिमाका) :  शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हीत जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रींडांगणावर आयोजित केलेल्या शेतकरी जनसंवाद …

Read More »

कोल्हापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

  कोल्हापूर : सीमावाद प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर दावा केल्यानंतर रणकंदन सुरु झाले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोम्माई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता शिवसैनिकांशी जोरदार झटापट झाली. ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंती …

Read More »

पत्नीचा गळा चिरुन केला खून; पती अटकेत

  कोल्हापूर जिल्ह्यातील घटना शिरोली : मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोटावर धारदार विळ्याने सपासप वार करून तसेच गळा चिरुन खून केला. खून करुन पती हातकणंगले पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजण्यासुमार गावाबाहेरील शेतवडीतील सुतार पांणद येथे घडली. पोलिसांतून …

Read More »

25 नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन; राजू शेट्टींचा एल्गार

  कोल्हापूर : आम्हाला कोणाचे देणंघेणं नाही, महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. ऊस परिषद, साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंत्र्यांना आता मैदानातचं जाब विचारला जाईल, असा …

Read More »

वेदगंगा, दूधगंगा नदीतील थेंबही पाणी देणार नाही

राजू पोवार : सीमाभागातील संघटनांचा कोल्हापूर आंदोलनात सहभाग निपाणी (वार्ता) : सुळकुड (ता. कागल) येथून दूध गंगा नदीद्वारे इचलकरंजी येथे पाणी पुरवण्याची मोठी योजना आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होऊन पुन्हा शेतकरी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे इचलकरंजी योजनेसाठी सीमाभागातील दूधगंगा नदीतून एक …

Read More »

शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलनाला हिंसक वळण; वाहतूक रोखल्याने कारखाना समर्थक आणि आंदोलकांमध्ये हाणामारी

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एकेक करून कारखान्याची धुरांडी सुरु होत असतानाच शिरोळ तालुक्यात मात्र अजूनही आंदोलनाचे लोण कायम आहे. तालुक्यात आज ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागले. ऊस वाहतूक रोखल्याने कारखाना समर्थक आणि आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने हाणामारी झाली. शिरटी फाट्यावर हा सगळा घडला. आंदोलन अंकुशकडून शिरटी फाट्यावर वाहतूक …

Read More »

डॉ. भारती पाटील यांनी नव्या जाणिवेचा डोळस विद्यार्थी घडवला : डॉ. किशोर बेडकीहाळ

कोल्हापूर : डॉ. भारती पाटील यांच्या अध्ययनातून नव्या जाणिवेचा डोळस विद्यार्थी घडविलेला आहे असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. किशोर बेडकीहाळ यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग, माजी विद्यार्थी संघटना आणि शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या वतीने राज्यशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. भारती पाटील यांच्या …

Read More »

4 वर्षांच्या मुलासह बापाचा खून, कोल्हापुरातल्या घटनेने खळबळ

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नात्यातील वादाचा वचपा काढण्यासाठी बाप लेकाचा खून केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. अवघ्या चार वर्षांच्या मुलासह 37 वर्षीय बापाचा शेतात गाठून खून करण्यात आला आहे. काल (दि. 04) रोजी दुपारी ही घटना घडली. दरम्यान या घटनेची माहिती …

Read More »

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय

  सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला …

Read More »