विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा मुंबई : मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाय. मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाहीय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी …
Read More »उद्धव ठाकरे जाणार की राहणार? याचा फैसला उद्याच होणार
बहुमत चाचणी उद्याच घ्या, न्यायालयाचे निर्देश नवी दिल्ली : राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे महाविकास आघाडी सरकार जाणार की राहणार याचा फैसला उद्या होणार आहे. गुरुवारीच बहुमत चाचणी घेण्यात यावी असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यपालांच्या आदेशावर आक्षेप घेऊन शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. …
Read More »औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतर
मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे मोठे 10 निर्णय मुंबई : आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. मंगळवारी देखील कॅबिनेटची बैठक झाली. 24 तासात राज्य मंत्रिमंडळाची …
Read More »मुख्यमंत्र्यांचा एक्झिट प्लॅन ठरला? पुन्हा शिवसेना-भाजप युती सरकारची नांदी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पुढचा अंक आता विधानसभागृहात होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र बहुमत चाचणीत पराभवाला सामोरं जाऊन नाचक्की करुन घेण्याऐवजी उद्धव ठाकरे आधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी अटकळ बांधली जात …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा एल्गार सुरुच, आता प्रकाश आबिटकरांच्या कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर हे बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या गळाला लागल्याने शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. आज शिवसैनिकांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत शिवसैनिकांना रोखले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी शिवसैनिकांना रोखल्यानंतर चांगलेच आक्रमक झाले. …
Read More »फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट! बहुमत चाचणीचं पत्र
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितील आणखी ट्वीस्ट वाढला असून आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सरकारच्या बहुमत चाचणीसाठी पत्र दिलं आहे. त्यावर कारवाई करत राज्यपाल यावर निर्णय घेणार आहेत. दरम्यान राज्यपालांनी ३० तारखेला अधिवेशन बोलावल्याचं खोटं पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यासंदर्भात राजभवनने स्पष्टीकरण देत हे …
Read More »एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल; पुत्राकडून शिव्या अन् बापाकडून…
गुवाहाटी : राज्यातील राजकीय पेचप्रसंग जटील बनत चालला आहे. शिवसेनेतील बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना परत फिरण्याचे आवाहन केले आहे. आपण मुंबईत या. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. तुम्ही आजही मनाने शिवसेनेतच आहात, अशी भावनिक साद बंडखोरांना घातली. यावर आता …
Read More »ठाकरे पिता-पुत्र आणि संजय राऊतांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा! उच्च न्यायालयात याचिका दाखल
मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि पक्षाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अराजकता आणि सरकारी काम रोखण्यासाठी तिन्ही नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते हेमंत …
Read More »कुर्ला इमारत अपघातात 11 जणांचा मृत्यू; बचाव, मदतकार्य अजूनही सुरूच
मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील नाईकनगर परिसरातील काल रात्रीच्या सुमारास इमारत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकाडा 11 वर गेला आहे. या ठिकाणी अद्यापही बचाव आणि मदतकार्य सुरू असून अजूनही अनेकजण या ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर …
Read More »संजय राऊत यांना तात्पुरता दिलासा, 14 दिवसांनी कागदपत्रांसह हजर होण्याची विनंती ईडीने स्वीकारली
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबाजवणी संचालनालय अर्थात ईडीकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ईडीने मागितलेली सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी संजय राऊत यांनी 14 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. ईडीने ही विनंती स्वीकारली आहे. त्यामुळे संजय राऊत चौकशीसाठी आता 14 दिवसांनी ईडी कार्यालयात हजर राहतील. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने संजय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta