Sunday , December 7 2025
Breaking News

महाराष्ट्र

शिवशाही बसचा भीषण अपघात; १५ प्रवासी ठार

  गोंदिया : शिवशाही बस उलटून १५ प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ घडली. या घटनेत २० ते २५ प्रवासी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवारी …

Read More »

मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब; एकनाथ शिंदेंचा गृहमंत्रिपदासह तब्बल 12 मंत्रि‍पदावर दावा

    नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदावरुन रंगलेले राजकारण संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता काल (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते उपस्थितीत होते. या बैठकीत मुख्यमंत्री …

Read More »

कृष्णा नदीच्या पुलावरून कार कोसळून तिघांचा मृत्यू

  सांगली / संजयनगर: कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावर उदगाव येथे पुलावरून चारचाकी गाडी खाली कोसळून भीषण अपघात झाला. अपघातात तीन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सांगलीच्या गावभागातील प्रसाद खेडेकर, त्यांच्या पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर आणि वैष्णवी संतोष नार्वेकर अशी मृतांची नावे आहेत. तर समरजीत प्रसाद …

Read More »

एकनाथ शिंदेंनी भाजपच्या दोन्ही ऑफर धुडकावल्या..

  मुंबई : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मंत्रि‍पदाची चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्रिपद भाजपलाच हवे आहे. त्याशिवाय शिवसेनेकडूनही मागणी करण्यात आली. पण भाजप मुख्यमंत्रीपदासाठी ठाम आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना दोन ऑफर दिल्या होत्या. या दोन्ही ऑफर एकनाथ शिंदे यांनी धुडकावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपदाऐवजी शिंदेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्यात उपमुख्यमंत्रीपद …

Read More »

नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन

  नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगत होती. यासंदर्भातील बातम्याही अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाल्या. मात्र प्रदेश काँग्रेसकडून याबाबतचा खुलासा करण्यात आला असून नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नसल्याचं सांगत पक्षाकडून यासंदर्भातील वृत्ताचं खंडन करण्यात …

Read More »

मुख्यमंत्रीपदासाठी दोन फॉर्म्युल्यांचा विचार!

  मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळाले आहे. यामुळे मुख्यमंत्रि‍पदी कोणाची निवड होणार याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याबद्दल महायुतीकडून काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते. आता नुकतंच मुख्यमंत्रि‍पदासाठी दोन फॉर्म्युले समोर आले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी अडीच – अडीच वर्षाचा फॉर्म्युला मुख्यमंत्रिपदाच्या 2 …

Read More »

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना महाराष्ट्रात “काव्यसुमन लेखणी गौरव पुरस्कार”

  पणजी : रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली महाराष्ट्र ‘सप्ताह फुलांचा’ या उपक्रमात सहभागी होऊन उत्कृष्ट कविता सादर केल्याबद्दल तसेच रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली तर्फे घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमात उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेष भारतातीलही अनेक साहित्यिकांना मान देऊन …

Read More »

सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर?

  एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. महायुतीनं 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपनं 132, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 41 जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर महायुतीकडे 236 जागांचं संख्याबळ …

Read More »

चंदगडमध्ये नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांचे औक्षण करताना उडाला आगीचा भडका

  कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. कोल्हापुरातील चंदगड विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी बाजी मारली. या विजयानंतर आमदार शिवाजी पाटील यांचं औक्षण करताना भडका उडाल्याची घटना घडली. या घटनेत शिवाजी पाटील थोडक्यात बचावले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील …

Read More »

महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार

  सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण, अखेर या मतदारसंघातील निकाल जाहीर झाला असून राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत आता …

Read More »