Sunday , July 26 2026
Breaking News

अर्जुन विष्णू जाधव साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

ठाणे : निर्भिड व परखडपणेच लिहिणारे नव्या दमाचे लेखक, कवी आणि पत्रकार अर्जुन विष्णू जाधव यांना मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर जयंती निमित्ताने अर्थात पत्रकार दिनी सा. ठाणे नवादूत याच्या वतीने ‘ साहित्य रत्न ‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अर्जुन विष्णू जाधव मुंबई ठाणे येथील वृत्तपत्रांतून झाली वीस-पंचवीस वर्षे आपलया निर्भिड व परखड लेखणीतून रोखठोकपणे सामाजिक जनजागृती व जन प्रबोधन करणारे लेखण करत असतात. त्याची पत्रकारितेसोबतही विविध विषयांवर ‘ जागर,बेळगाव कुणाच्या बापाचं, बागलकोटची सुगंधा, माझा बाप उद्ध्वस्त गिरणी कामगार, लेक जगवा लेक शिकवा, व्यसनमुक्ती, प्रेयसी एक आठवण ‘आदी पुस्तके प्रसिद्ध झालेली असून महाराष्ट्र शासनसह अनेक संस्था, मंडळ, संघटना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास

Spread the love  पुणे : महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, ‘युवक क्रांती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *