जालना : सगेसोयरे अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा विधानसभेत नाव घेऊन आमदारांना पाडू असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात ते उपोषणाला बसणार आहे. पोलिसांनी …
Read More »तुमचे काम सुरू ठेवा, अमित शहांचा फडणवीसांना राजीनामा न देण्याचा सल्ला
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे, महायुतीचे सर्वच नेते निराश झाले असून पुढील विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखण्यासंदर्भात ते बोलत आहेत. त्यातच, भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच, वरिष्ठांनी मला सरकारमधून दूर …
Read More »आंदोलन चिरडण्याच्या मागे लागू नका; जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री, फडणवीसांना इशारा
जालना : राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मी आमरण उपोषणावर ठाम असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम …
Read More »एकनाथ शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळालं. महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा 31 जागांवर विजय झाला आहे. आता लोकसभेच्या निवडणूक निकालांनंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू …
Read More »सरकारच्या जबाबदारीतून मला मोकळ करावे; देवेंद्र फडणवीसांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधून बाहेर पडायचे असून त्यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला कमी जागा आल्या. राज्यातील पराभवाची जबाबादारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीमाना देण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षातील नेत्यांनी वरपासून ते खाली तळापर्यंत मेहनत घेतली. मात्र …
Read More »7 जणांना चिरडणारी “ती” कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी कुलगुरुंची
कोल्हापूर : कोल्हापूरातील सायबर चौकामध्ये 7 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्रभारी कुलगुरूंची आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू वसंत चव्हाण यांच्या कारने चार दुचाकींना जोरदार धडक दिली होती. या अपघातामध्ये वसंत चव्हाण यांचा देखील मृत्यू झाला आहे. माजी कुलगुरूंची तब्येत बरी नसताना देखील ते कार चालवत …
Read More »कोल्हापूरात मतमोजणीची रंगीत तालीम, प्रशिक्षण यशस्वी, निवडणूक निरीक्षक यांनी तयारीबाबत घेतला आढावा
कोल्हापूर (जिमाका) : कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगले मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी सहा व टपाली मतदानासाठी एक अशा प्रत्येकी सात मतमोजणी केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे रंगीत तालीम आणि प्रशिक्षण …
Read More »कोल्हापूरच्या सायबर चौकात भरधाव कारने दुचाकींना उडवले; तिघांचा मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापुरातील सायबर चौकात झालेल्या एका भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका कारने चार ते पाच दुचाकींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यामुळं धडक दिलेल्या दुचाकी उडून इतर दुचाकींना धडकल्या त्यावरील लोकही ‘कॅरम बोर्ड’ फोडल्याप्रमाणं उडाली. या भीषण अपघातात …
Read More »लोकसभा निकालानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार
नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; महामंडळावरही नियुक्त्या होणार मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठे बदल होण्याची शक्यता असून राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये काही मंत्र्यांची खाती बदलली जातील, तसेच काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही …
Read More »भाजपा कोल्हापूरच्यावतीने जितेंद्र आव्हाड विरोधात जोरदार निदर्शने
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. सर्वप्रथम भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित कदम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta