Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; हे शेतकऱ्यांचे सरकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  मुंबई : अवकाळी पावसावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे आहे, असे स्पष्ट केले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले …

Read More »

राजहंसगड छ. शिवाजी महाराज मूर्ती दुग्धाभिषेक सोहळ्याला मोठ्या संख्येने सहभागी व्हा; तालुका समितीचे आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीला महाअभिषेक घालण्यात येणार आहे. रविवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. बेळगाव तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की सदर कार्यक्रमानिमित्त महाअभिषेक व महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या …

Read More »

दुग्धाभिषेक सोहळ्याची प्रशासनाला पूर्वकल्पना

  बेळगाव : राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुग्धाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असून नियमानुसार या सोहळ्याची पूर्वकल्पना प्रशासनाला देण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गुरुवारी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सोहळ्याची माहिती देणारे निवेदन सादर केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली राजहंसगडावरील …

Read More »

हलगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी सागर कामाण्णाचे

    बेळगाव  : हलगा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली असून अध्यक्षपदी सागर कामाण्णाचे यांचा विजय झाला आहे. सागर कामाण्णाचे यांनी तवनाप्पा पायाक्का यांचा पराभव केला. निवडणूक अधिकारी म्हणून हेस्कॉम अधिकारी वैशाली तुडवेकर यांनी काम पहिले. सागर कामाण्णाचे यांना १० तर तवनाप्पा पायाक्का यांना ८ मते पडली आहेत. यावेळी ग्रामपंचायत …

Read More »

सुरळीत पाण्यासाठी निपाणी नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा

  पाणी बिलावर विरोधीगट, नागरिक आक्रमक : पालिका प्रशासन धारेवर निपाणी (वार्ता) : २४ तास पाणी योजनेचे अपूर्ण काम, अनियमित पाणीपुरवठा, वाढीव पाणी बिल यासह विविध मागण्यांसाठी शहर व उपनगरातील नागरिकांनी विरोधी गटनेते विलास गाडीवड्डर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी नगरसेवकांनी गुरुवारी (ता.१६) नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला. येथील बेळगाव नाक्यावरील बॅरिस्टर नाथ …

Read More »

जिजामाता महिला सहकारी बँकेच्या चेअरमनपदी उचगावच्या सौ. भाविकाराणी होनगेकर

  बेळगाव : कर्नाटकातील पहिली महिला सहकारी बँक व सहकार क्षेत्रातील एक अग्रेसर असलेल्या बेळगाव येथील जिजामाता महिला सहकारी बँकेच्या चेअरमनपदी उचगावच्या सौ. भाविकाराणी जीवनराज होनगेकर यांची संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. कर्नाटकातील पहिली महिला सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या व …

Read More »

येळ्ळूर विभाग समितीकडून दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी पंचगंगेचे जल

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने येळ्ळूर राजहंसगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराज दुग्धाभिषेक सोहळा रविवार दिनांक 19 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर सात नद्यांच्या जलाशयाने जलाभिषेक करून महाराजांना मुजरा करावयाचा आहे. त्या अनुषंगाने आज येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी सकाळी सात वाजता येळ्ळूरहून कोल्हापूर येथील …

Read More »

सीमाभागात आरोग्य सुविधा देण्याचा महाराष्ट्राचा निर्णय निषेधार्ह; मुख्यमंत्री बोम्माई

  बेळगाव : कर्नाटकाच्या सीमेवरील 865 गावांतील लोकांना महाराष्ट्र सरकारतर्फे आरोग्य सुविधा देण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय निषेधार्ह असून, याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळुरातील आरटी नगरातील निवासस्थानाजवळ प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, कर्नाटकाच्या सीमाभागातील लोकांना आरोग्य कवच देणे हा …

Read More »

सर्वसामान्यांच्या सेवेसाठी निवडणूक रिंगणात : उत्तम पाटील

हुन्नरगीत हळदी – कुंकू कार्यक्रम निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेते मंडळी विकास कामे केल्याचा आव आणत आहेत. प्रत्यक्षात अनेक समस्यांना मतदारसंघातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र आपण सत्तेत नसतानाही अरिहंत उद्योग समूहातून समाज हिताची कामे केली आहेत. समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन सर्वसामान्यांच्या सेवेसाठी निवडणूक रिंगणात आहोत. …

Read More »

खानापूर विद्यानगरात विकास कामाला अडथळा आणणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा; नागरिकांची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विद्यानगरातील सर्वे नंबर ९२/२ मध्ये नगरपंचायतीकडून गटारी, रस्ते आदी विकास कामे केली जात आहेत. असे असताना विद्या नगरातील रहिवासी निळू पाटील हे नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसराना व इजिनिअरना मोबाईल व्दारे विद्या नगरात विकास काम का करता. सर्वे नंबर ९२/२ ही जमिन सरकार जमा झाली आहे. …

Read More »