Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

राहुल गांधींवर शंकराचार्य अविमुक्‍तेश्वरानंद भडकले; हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची केली घोषणा

  नवी दिल्ली : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी आता हिंदू धर्माचे सदस्य नाहीत. त्यांना हिंदू धर्मातून सार्वजनिकरित्या बहिष्कृत करण्यात येत आहे, अशी घोषणा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली. शंकराचार्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बद्रीनाथ येथील …

Read More »

प्राणघातक शस्त्रांनी वार करून तरुणाची निर्घृण हत्या

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात एका तरुणाची रस्त्याच्या मधोमध निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरातील परशुराम गोंधळी (वय २५) नावाच्या तरुणाची घातक शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली. गोकाक शहरातील जेआरबीसीकडे जाणाऱ्या गेटजवळ ही घटना घडली. पोलिसांना हाक मारून त्यांना मारल्यानंतर आरोपी पळून गेले. …

Read More »

राजहंसगड चढणे उतरणे स्पर्धा उद्या

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे रविवार दि. 4 रोजी राजहंसगड चढणे-उतरणे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7.30 वा. येळ्ळूर गडाच्या पायथ्यापासून या स्पर्धेला प्रारंभ करण्यात येणार आहे. मुला- मुलींच्या दोन वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात येईल. विजेत्यांना रोख रक्कमेसह गंगाराम सेवा ट्रस्टतर्फे आकर्षक स्मृतीचिन्ह देण्यात …

Read More »

‘अलमट्टी’च्या उंचीवरून कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचा कर्नाटकला इशारा

  कोल्हापूर : कर्नाटक सरकारचा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी अट्टाहास कायम आहे. या संदर्भात कायदेशीर हालचाली करण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सुद्धा इशारा दिला आहे. जर कर्नाटक सरकार वकील आणि जलतज्ज्ञांची फौज उभा करत असेल, तर आम्ही देखील त्या विरोधात तशीच वकिलांची …

Read More »

बसव जयंतीनिमित्त उद्या बेळगावात भव्य मिरवणूक

  बेळगाव : कर्नाटकाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आणि महान मानवतावादी, विश्वगुरु बसवण्णांच्या जयंतीनिमित्त उद्या ४ मे रोजी सायंकाळी ४ वाजता बेळगावात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. बसव जयंती उत्सव समितीने सर्व नागरिकांना या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बसव जयंती उत्सव समितीने केले आहे. जगज्योती, मानवतावादी आणि सांस्कृतिक गुरू …

Read More »

हिंदु कार्यकर्ता सुहास शेट्टी हत्या प्रकरणावरून बेळगावात भाजप कार्यकर्त्यांचा संताप

  बेळगाव : हिंदू कार्यकर्ते सुहास शेट्टी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बेळगावात भाजप महापालिका विभागाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. शहरातील चन्नम्मा चौकात भाजपचे शेकडो कार्यकर्ते एकवटले होते. हातात बॅनर आणि पोस्टर्स घेऊन कार्यकर्त्यांनी काँग्रेस सरकार आणि सिध्दरामय्यांविरोधात घोषणा देत सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे पोस्टर्स फाडून यावेळी निषेध नोंदविण्यात आला. ही …

Read More »

नेताजी सोसायटीचे संचालक भरतकुमार मुरकुटे यांना शोकसभेत श्रद्धांजली

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक भरतकुमार मुरकुटे यांचे मंगळवार (ता. 29) रोजी आकस्मिक निधन झाले. त्यानिमित्त नेताजी सोसायटीच्या सभागृहामध्ये शुक्रवार (ता. 2) रोजी त्यांना सोसायटीचे संचालक, सल्लागार व कर्मचारी वर्गाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. कै.भरतकुमार मुरकुटे यांच्या फोटोचे पूजन सोसायटीचे चेअरमन डी. …

Read More »

चोर्ला गावानजीक मालवाहू रिक्षा आणि दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार ठार

  खानापूर : बेळगाव – गोवा मार्गावरील चोर्ला गावानजीक आज शनिवार दिनांक 3 मे 2025 रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास अशोक लेलँड मालवाहू रिक्षा आणि दुचाकीची धडक झाल्याने कणकुंबी येथील युवक विक्रम कोळेकर (वय 28 वर्ष) हा युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, विक्रम …

Read More »

गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, ७ जणांचा मृत्यू

  पणजी : गोव्यातील शिरगांव येथील यात्रेत चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली आहे. श्री लैराई देवी मंदिरात शुक्रवारी रात्री श्री लैराई यात्रेदरम्यान गर्दी अचानक नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर गोवा मेडिकल कॉलेज आणि मापुसा येथील नॉर्थ …

Read More »

शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू; चिक्कोडी तालुक्यातील दुर्दैवी घटना

  चिक्कोडी : शाळेला सुट्टी असल्याने शेतात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात घडली. इंगळी गावातील पृथ्वीराज केराबा (१३), अथर्व सौंदलगे (१५) आणि समर्थ गडकरी (१३) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तिघेही सायकली घेऊन गावाबाहेरील शेततळ्यात पोहायला शिकण्यासाठी गेले. तिघांनाही पोहता …

Read More »