खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खानापूर ते रामनगर रस्त्याची दैयनिय अवस्था झाली असून यंदाच्या पहिल्याच पावसात आवजड वाहने अडकून पडण्याची घटना नुकताच घडली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनाना जाण्यासाठी रस्ता नसल्याने अवजड वाहनाच्या एक किलो मिटर अंतरापर्यंत रांगा लागल्या आहेत.
अशा अवस्थेत वाहन चालकाना उपासमारीची वेळ येत आहे.
खानापूर-रामनगर महामार्गावर भयानक अवस्था झाली आहे. त्यामुळे भागातील जनतेचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहे.
तेव्हा याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरावस्था दुर करावी अशी मागणी सर्वथरातून होत आहे.
