Monday , December 8 2025
Breaking News

निलावडे येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून काजू, चिकूची झाडे भस्मसात

Spread the love

 

निलावडे (तानाजी गोरल) : खानापूर तालुक्यात गेल्या आठवड्याभरात आगीचा वनवा पडण्याचे प्रकार अधिक प्रमाणात वाढले आहेत. दररोज एक-दोन ठिकाणी आग लागून शेतवडी साहित्याचे नुकसान होत आहे. आज शनिवारी देखील खानापूर तालुक्यातील निलावडे येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतवडीतील काजू, चिकूची झाडे तसेच गवतगंजीसह शेतीचे बरेसे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने जवळपास दोन ते तीन ट्रॅक्टर गवतगंजी जळून खाक झाली. या आगीच्या भडक्यामुळे जवळच असलेल्या ऊस पिकात आग शिरली व ऊसही जळून खाक झाला. यामध्ये असलेले शेती पाईप व इतर साहित्य जळून नुकसान झाले आहे. तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले पण तोवर प्रयत्न करून शेतकऱ्यांनी आग विझवली. वेळीच आग आटोक्यात आले नसती तर अनर्थ घडला असता. या चार दिवसात खानापूर तालुक्यात अनेक ठिकाणी आगीची ठिणगी पडून नुकसान झाले आहे. रेल्वेचे काम सुरू असताना लोंढा जवळ आग ठिणगी पडून चार एकर जंगल जळून खाक झाले. शिवाय इदलहोंड येथे झोपडपट्टीला आग लागून चार झोपड्या जळून खाक झाल्या. होणकल येथेही काजूची बाग जळून नुकसान झाले. अशा अनेक ठिकाणी लहानसहान आगीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांनी सतर्कता राखणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *