Saturday , July 27 2024
Breaking News

खानापूरच्या विद्यानगरात रस्ता, गटारीच्या समस्या

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात रस्ता, गटारीच्या समस्या नेहमीच भेडसावित आहे.
याकडे खानापूर नगरपंचायतीचे तसेच या भागाच्या नगरसेवकांचे साफ दुर्लक्ष होत आहे.
विद्यानगरातील रहिवाशाना गेल्या कित्येक वर्षापासून रस्ताच नाही. त्यामुळे सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात विद्यानगरात रस्त्यावर चिखलातून ये-जा करणे सर्वानाच त्रासाचे झाले आहे.
विद्यानगरात गटारीची समस्या
रस्त्याप्रमाणेच गटारीचीही समस्या नेहमीच विद्यानगरात भडसावित आहे. गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच डुक्कराची वर्दळही वाढली आहे. त्यामुळे डुक्करापासून नागरिकांना त्रास संभवत आहे.
विद्यानगराच्या रस्त्यावर कचर्‍याचे ढीग जागोजागी पसरले आहेत. याकडे नगरपंचायतींचे साफ दुर्लक्ष झाले आहे. खानापूर शहरातील विद्यानगरातील समस्याकडे आतातरी लक्ष देतील काय? असा सवाल नागरिकातून विचारला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *