Saturday , July 27 2024
Breaking News

जांबेगाळीच्या शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : जांबेगाळी (रेडेकुंडी) (ता. खानापूर) येथील शेतकरी प्रकाश बाळकृष्ण देसाई (वय 46) हे आपल्या बैलगाडीतून शेतात मळणी केलेले भात आणण्यासाठी शनिवारी दि. 4 रोजी सायंकाळी जात असताना बैलगाडी पलटी झाल्याने प्रकाश देसाई यांना जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांना समजताच त्यांनी खानापूर सरकारी दवाखान्यातील शवागृहात प्रत्यक्ष भेट देऊन मृतदेह उतरीयतपासणीसाठी डॉक्टर भेटून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यास मदत केली.
यावेळी सरकारी दवाखान्यात मृतदेहाची डॉक्टरनी उतरीयतपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नंदगड पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.

About Belgaum Varta

Check Also

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *