Tuesday , September 17 2024
Breaking News

विद्यार्थ्यांनी निभावला मतदानाचा हक्क!

Spread the love

 

खानापूर : पहिल्यांदा मतदान करण्याची उत्सुकता सर्वांमध्येच असते. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी युवा वर्ग धडपड करीत असतो. मात्र शिक्षण खात्याने मतदार साक्षरता संघामार्फत शालेय मंत्रिमंडळ निवड प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते याचे धडे मिळत असून मंगळवारी हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल येथे उत्साहात मतदान प्रक्रिया घेण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शाळेमध्ये विविध संच स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळे संघ निर्माण करण्याचे काम शाळेत हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मतदार साक्षरता संघ निर्माण करण्यात आला असून या संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून मतदानाचे महत्त्व व उमेदवार निवडीचे ज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध शाळांमध्ये मतदार साक्षरता संघाच्या वतीने निवडणूक घेण्यात येत आहे.
शिवाजी हायस्कूल येथे निवडणूक घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपली नावे नोंदवण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी उमेदवार म्हणून आपली नावे नोंदवली होती. त्यानंतर शाळेच्या आवारात विधानसभा किंवा लोकसभेसाठी ज्याप्रमाणे मतदान घेतले जाते त्याप्रमाणे मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. तसेच अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना दोन दिवस प्रचार करण्यासाठी देण्यात आले होते. मुख्याध्यापक किरण देसाई यांनी निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडावी अशा सूचना सर्वांना केल्या होत्या. यावेळी सहशिक्षिका प्रियांका काकतकर यांनी पीआरओ, भाग्यश्री दळवी एपीआरओ तर शशिकांत कांबळे व सारंग सुतार यांनी पीओ आणि शंकर रागी पाटील यांनी सेक्टर ऑफिसर म्हणून काम पाहिले. मतदानाची वेळ झाल्यानंतर मतमोजणी करून शालेय मंत्रिमंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेची माहिती मिळाल्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
…………………………………………………………………………

शिक्षण खात्याने मतदान साक्षरता संघामार्फत विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व व उमेदवार निवडीचे ज्ञान मिळावे यासाठी मतदान साक्षरता संघ निर्माण करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार मतदान घेऊन विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया कशी असते याची माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना प्रचार करण्यासाठी ही वेळ देण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.
– किरण देसाई, मुख्याध्यापक

About Belgaum Varta

Check Also

लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!

Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *