Wednesday , December 10 2025
Breaking News

हालात्री नदीचा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील नद्या, नाल्याना पाण्याचा प्रवाह वाढल्याने गेल्या दोन दिवसापासून खानापूर हेम्माडगा मार्गावरील हालात्री नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने शिरोली, शिरोलीवाडा, हेम्माडगा, डोगरगांव, नेरसा, अशोकनगर आदी भागातील जवळपास २५ खेड्याचा संपर्क खानापूर शहराशी तुटला त्यामुळे हायस्कूल, काॅलेजच्या विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या मार्गावरील बससेवा व इतर वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. या भागातील म्हादाई नदीच्या खोऱ्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्याची पातळी वाढली आहे. तेव्हा खानापूर प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *