Wednesday , December 10 2025
Breaking News

खानापूर तालुक्यातील दक्षिण भागात गेल्या 8 दिवसापासून वीजपुरवठा खंडित

Spread the love

 

खंडित वीजपुरवठ्यामुळे  लोकांचे आरोग्य धोक्यात

खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर तालुक्यातील नागरागाळी भागातील अनेक गावांत गेल्या 5 ऑगस्टपासून वादळी पावसामुळे विजेचा पुरवठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे येथील परिसरात लोकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.
तालुक्यातील नागरगाळी, बामनकोप, कृष्णानगर, कुंभार्डा, तारवाड, कोडगई, सुवतवाडी, चिंचेवाडी, मुंडवाड, पिंपळे, मांजरपै, माचाळी, सतानाळी, शिवठाण, शिंदोळी बी के, शिंदोळी के एच या गावात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे या परिसरातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वीज पुरवठा नसल्याने सर्व बोरवेल बंद आहेत. नाले, झरे यातील पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने सध्या पावसाचे पाणी उकळून पिण्याची वेळ आली आहे. यामुळे आरोग्यच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर वेळीच उपाय होणं गरजेचं आहे. त्यासाठी शासनाने वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांतून आहे.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *