Wednesday , December 10 2025
Breaking News

फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट! बहुमत चाचणीचं पत्र

Spread the love

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितील आणखी ट्वीस्ट वाढला असून आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सरकारच्या बहुमत चाचणीसाठी पत्र दिलं आहे. त्यावर कारवाई करत राज्यपाल यावर निर्णय घेणार आहेत. दरम्यान राज्यपालांनी ३० तारखेला अधिवेशन बोलावल्याचं खोटं पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यासंदर्भात राजभवनने स्पष्टीकरण देत हे पत्र खोट असल्याचं सांगितलं आहे.
काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरकारच्या बहुमताच्या चाचणीसाठी मागणीचे पत्र दिले आहे. त्यावर राज्यपाल आता निर्णय घेणार आहेत. त्यामुळे महाविकास सरकार संकटात सापडलं आहे. सरकारला लवकरच आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या ३९ आमदारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे सध्या सरकार अल्पमतात चालू आहे म्हणून आम्ही राज्यपालांकडे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे.” असं ते म्हणाले.
दरम्यान राज्याच्या सत्ता संघर्षात तब्बल ९ दिवसांनी भाजपने एंट्री केली असून राज्यपालाची भेट घेत भाजपने मविआ सरकारच्या अडचणी वाढवल्या आहेत. दरम्यान बंड केलेल्या आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने १२ जुलै पर्यंत लांबवली आहे. त्यानंतर राज्यपालांच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *