Monday , December 8 2025
Breaking News

मदरशांमध्ये मुलांना धर्मनिंदा करणार्‍यांचा शिरच्छेद करायला शिकवले जाते : केरळ राज्यपाल आरिफ खान

Spread the love

नवी दिल्ली : भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणार्‍या राजस्थानमधील उदयपूरमधील कन्हैया लालची तलवारीने गळा चिरून झालेल्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. भारतात तालिबानी विचारसरणीच्या वाढत्या प्रसाराची सर्वांनाच चिंता आहे. मुस्लिम समाजातील एका वर्गातील वाढत्या सनातनी प्रवृत्तींवर टीका करायची की नाही? प्रश्न उपस्थित करायचे की नाही? असा विचार लोक करू लागले आहेत.
समाजातील एका वर्गातील वाढत्या कट्टरतेच्या कारणांवरूनही विविध गोष्टी केल्या जात आहेत. दरम्यान, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मदरसे हे द्वेषाचे मूळ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, लहानपणापासून शिकवले जाते की कोणी विरोधात बोलले तर शिरच्छेद करा.
मदरशांमध्ये मुलांना कट्टर बनवले जात आहे : आरिफ मोहम्मद
आरिफ मोहम्मद म्हणाले, ’आमच्या मुलांना धर्मनिंदा करणार्‍यांचे शिरच्छेद करायला शिकवले जात आहे का? हा प्रश्न आहे. मुस्लीम कायदा कुराणातून आलेला नाही, तो कोणी एका व्यक्तीने लिहिला असून त्यात शिरच्छेदाचा कायदा आहे आणि हा कायदा मदरशात मुलांना शिकवला जात आहे. राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैया लालच्या निर्घृण हत्येसंदर्भात त्यांनी या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, जेव्हा आम्हाला लक्षणे दिसतात तेव्हा आम्ही काळजीत असतो. परंतु, गंभीर प्रवृत्तीला स्वीकारण्यास नकार देतो.
आरिफ मोहम्मद खान यांची कट्टरतेवर अनेकदा टीका
आरिफ मोहम्मद खान अनेकदा म्हणतात की, मौलाना आणि मदरसे मुस्लिमांच्या एका वर्गाला कट्टरपंथी बनवत आहेत. ते गैर-मुस्लिमांबद्दल द्वेष शिकवतात, ज्यामुळे बालपणात इतर धर्मांबद्दल द्वेष निर्माण होतो. अशा परिस्थितीत, जेव्हा ते मोठे होतात, तेव्हा ते नेहमी इतर धर्माच्या लोकांबद्दल सावध असतात आणि संशयाने भरलेले असतात. आरिफ खानच्या यांच्या या विचारांवरही जोरदार टीका होते.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *