Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

४२ वर्षांनंतर भरणार कंग्राळी बुद्रुकची महालक्ष्मी यात्रा

  बेळगाव : ग्रामदैवत महालक्ष्मी यात्रा आणि भंडारा उत्सवाच्या परंपरेचा पुनर्जन्म करत, बेळगाव जिल्ह्यातील कंग्राळी बुद्रुक गावाने १९८४ नंतर एप्रिल २०२६ मध्ये भव्य महालक्ष्मी यात्रा आयोजित करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या एकमताने घेतला आहे. आज लक्ष्मी मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून यात्रेच्या तयारीला सुरुवात करण्यात आली, तर भंडारा उत्सवात गावकऱ्यांनी उत्साहात सहभाग दाखवून …

Read More »

गॅस सिलेंडर व तेलाच्या दरवाढीचा निषेध करत युवक काँग्रेसचे केंद्राविरोधात निदर्शने

  बेळगाव : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे मुख्य सचिव राहुल जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आज राणी चन्नम्मा चौकातून युवक काँग्रेसने आंदोलनात्मक मोर्चा काढला. प्लास्टिकची खेळण्यातील गाडी आणि रिकाम्या सिलिंडरचे प्रदर्शन करून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. या प्रसंगी काँग्रेसचे मुख्य सचिव …

Read More »

बेकायदेशीर दारू साठ्यावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

  बेळगाव : गोव्यातील दारू साठा बेळगावात साठवून बेकायदेशीर मार्गाने विक्री करणाऱ्या आरोपीच्या घरावर बेळगाव पोलिसांनी छापा टाकून दारू जप्त करून आरोपीला अटक केली. शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अटक केलेल्या आरोपीचे नाव सुभाष सुधीर डे (४६ रा. महाद्वार रोड) असे आहे. त्याने शहापूर येथील हुलबत्ते कॉलनीतील पहिल्या …

Read More »

बोलेरो आणि परिवहन बस यांच्यात भीषण अपघात: एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

  यादगिरी : यादगिरी जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मद्दरकी जवळ राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री बोलेरो आणि परिवहन बस यांच्यात भीषण अपघात झाला असून यात चार जण जागीच ठार झाले आहेत. शरणप्पा (30), सुनिता (19), सोमव्वा (50) आणि थंगम्मा (55) अशी मृतांची नावे आहेत, ते सर्व वर्कनहळ्ळी गावातील रहिवासी आहेत. इतर अनेक …

Read More »

संस्कारच आयुष्यभर उपयोगी पडतील : आप्पासाहेब गुरव

  बेळगाव : “बालपणीच मुलांवर संस्कार केले तर आयुष्यभर ते उपयोगी ठरतात. आज संपन्न होत असलेल्या शिबिरामध्ये अनेक विद्यार्थ्यांवर योगाबरोबरच जे संस्कार करण्यात आले ते त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतील” असे विचार मराठा मंदिर चे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी बोलताना व्यक्त केले. योग विद्याधाम फाउंडेशनच्या वतीने मराठा मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात …

Read More »

बेळगावात अमानुष घटना; दारू पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

  बेळगाव : गेल्या तीन वर्षांपासून नराधम व अल्पवयीन मुलगी यांच्यात मैत्री होती. या मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उशिरा उघडकीस आली आहे. बेळगाव येथील औरंगजेब (23) याचे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळख होती. ओळखीतून मैत्री झाली. नराधम वारंवार दारूच्या नशेत मुलीच्या घरात …

Read More »

भगवान महावीर जयंतीची भव्य शोभायात्रा उत्साहात!

  बेळगाव  : भगवान श्री महावीर जयंती निमित्त बेळगावात भव्य शोभयात्रा, काढण्यात आली. शोभयात्रेत हजारो अबालवृद्ध सहभागी झाले होते. शहरातील भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीच्यावतीने आयोजित आजच्या शोभायात्रेला धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. शोभायात्रेत शहरातील दिगंबर, श्वेतांबर, मूर्ती पूजक स्थानकवासी (तेरापंथी) जैन समाजातील अबालवृद्ध शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये …

Read More »

शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये 12 एप्रिलपासून चैत्र यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

  बेळगाव : शिवबसवनगर, बेळगाव येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये येत्या शनिवार दि. 12 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या चैत्र यात्रेची जय्यत तयारी करण्यात येत असून यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये येत्या शनिवार दि. 12 रोजी सकाळी 6 वाजता महाअभिषेक होणार असून त्यानंतर दवना …

Read More »

वनिता विद्यालय शाळेची वार्षिक फी वाढविल्याने पालकांतून नाराजी!

  बेळगाव : शहरातील क्लब रोडवरील वनिता विद्यालय या शाळेत विद्यार्थ्यांची वार्षिक फी कोणतीही पूर्वसूचना न देता वाढवल्यामुळे शाळा प्रशासनावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळेच्या वार्षिक निकालाच्या दिवशी सदर ही वाढीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे शाळेत पालकांचा एकच गोंधळ उडाला. अचानकपणे केलेल्या फी वाढच्या घोषणेमुळे पालक संतप्त झाले. …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध ५०० कोटींचा किकबॅक आरोप

  खटल्याला परवानगीसाठी राज्यपालांकडे अर्ज बंगळूर : मुडा घोटाळ्याच्या चौकशीला सामोरे जात असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर आता आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. खाण कंत्राट नूतनीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी ५०० कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते राममूर्ती गौडा यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना लाच …

Read More »