Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना ध्यानधारणा अनिवार्य

  बंगळूर : शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी आणि तणावमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ध्यान करण्याचे आवाहन केले आहे. यापुढे शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना १० मिनिटे ध्यान करण्याची मुभा देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना …

Read More »

अभाविपची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

  बेळगाव : अभाविपच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी बेळगावात निदर्शने करून सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील थकीत शिष्यवृत्ती तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी केली. दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी लाखो गरीब आणि हुशार विद्यार्थी अर्ज करतात. शिष्यवृत्तीचीही रक्कम त्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरते. मात्र अर्ज केल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये शिष्यवृत्ती जाहीर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु बऱ्याच …

Read More »

आमदार रेणुकाचार्य यांच्या बेपत्ता पुतण्याचा मृतदेह सापडला!

  दावणगिरी : होन्नाळीचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव रेणुकाचार्य यांच्या बेपत्ता झालेल्या पुतण्याचा मृतदेह तुंगभद्रेच्या कालव्यात बंद कारगाडीत आढळला आहे. रेणुकाचार्य यांचे भाऊ एम. पी. रमेश यांचा मुलगा चंद्रशेखर हा चार-पाच दिवसांपासून बेपत्ता होता. यासंदर्भात होन्नाळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी चंद्रशेखर हा शिमोगा येथील गौरीगड्डे …

Read More »

सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी कॅन्टोन्मेंट रहिवाशांचे रास्तारोको

  बेळगाव : गेल्या कित्येक दिवसांपासून कॅम्प परिसरात अनियमित पाणीपुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे संतप्त झालेल्या कॅम्प परिसरातील रहिवाशांनी आज अचानक रास्तारोको आंदोलन केले. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा निषेध करत खानापूर मार्ग रोखून धरला. गेल्या कित्येक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा न झाल्याने कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांची …

Read More »

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकारातून सह्याद्रीनगरसाठी पथदिपांची सोय

  बेळगाव : सह्याद्रीनगर (बेळगाव) येथील जनतेच्या मागणीला प्रतिसाद देत बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तातडीने या भागासाठी पथदिपांची व्यवस्था केली. सह्याद्रीनगर येथील स्थानिक नागरिकांनी बुधवारी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पुरेसे पथदिप नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल चर्चा केली. यानंतर बुधवारी रात्रीचं आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी …

Read More »

एन. पी. एस. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी संकल्प यात्रेचे आयोजन

  बेळगाव : राज्य सरकारी एन. पी. एस. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी ६ नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य सरकारी एन. पी. एस. कर्मचारी संघाचे अध्यक्ष एन. टी. लोकेश यांनी दिली. गुरुवारी बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

युद्ध, कोविड असूनही भारतात विक्रमी गुंतवणूक

  पंतप्रधान नरेंद्र मोदी, बंगळूरातील गुंतवणुकदारांच्या मेळाव्याचे उद्घाटन बंगळूर : युद्ध आणि कोविड महामारीचे परिणाम असूनही जग भारताकडे पाहत आहे. देश विक्रमी गुंतवणूक आकर्षित करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘इन्व्हेस्ट कर्नाटक २०२२’ या बंगळूरातील जागतिक गुंतवणुकदारांच्या मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. या …

Read More »

छ. शिवरायांच्या मूर्तीची बिजगर्णीत आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना

  बेळगाव : सोमवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बिजगर्णी गावात छ. शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धारीत मूर्तीची आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, उल्लेखनीय कामगिरी करणारे राष्ट्रपुरुष हे आपल्या सर्वांसाठी आदर्श आहेत तर त्यांच्या मूर्ती भावी पिढीसाठी वंदनीय आहेत. अशा राष्ट्रपुरुषांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संधी …

Read More »

काळ्या दिनाच्या सभेत शुभम शेळकेची मुक्ताफळे!

  बेळगाव : काळ्या दिनाच्या सायकल फेरीनंतर मराठा मंदिर येथे परंपरेनुसार जाहीर सभा घेण्यात आली. समितीच्या ज्येष्ठ नेत्यांची भाषणे चालू होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्या भाषणानंतर सभेचा समारोप लवकर करायचे असे ठरले होते, मात्र उपस्थितांच्या निष्ठेचा अपमान करत “मीच काय तो एकटा …

Read More »

काळा दिन संपूर्ण महाराष्ट्रात पाळला पाहिजे : माजी आमदार के. पी. पाटील

  बेळगाव : काळा दिन हा फक्त सीमाभागातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पाळला गेला पाहिजे. केवळ औपचारिकता म्हणून विधिमंडळात ठराव मांडणे आणि भाषण करणे इतकेच महाराष्ट्र सरकार करत आहे. महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नांकडे गांभीर्याने पहात नाही. तेव्हा आता महाराष्ट्र सरकारला झोपेतून जागे करायची वेळ आली आहे, असे वक्तव्य राधानगरीचे माजी आमदार …

Read More »