Saturday , July 27 2024
Breaking News

मंत्री देणार अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट : मुख्यमंत्री बोम्माई

Spread the love

नुकसानीच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरू

बंगळूर : राज्यातील सर्व मंत्री पावसाने ग्रासलेल्या जिल्ह्यांचा दौरा करतील आणि तेथे मदतकार्याची देखरेख करतील. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी सर्व्हेक्षण सुरू असून लवकरात लवकर नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई रविवारी येथे म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.
अनेक मंत्री अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये आहेत कारण हा अवकाळी पाऊस होता. काही मंत्री, जे पूर्वी जाऊ शकले नाहीत, ते देखील आपापल्या जिल्ह्यात जातील, असे बोम्माई म्हणाले.
त्यांनी निदर्शनास आणले की, 10 डिसेंबरच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची देखील परवानगी घेणे आवश्यक आहे आणि या संदर्भात ते निवडणूक आयोगाशी बोलले आहे.
मी आयोगाला मंत्र्यांना अधिकार्‍यांसोबत बैठका घेण्यास परवानगी द्यावी, सर्व्हेक्षणाच्या कामाला परवानगी द्यावी, असे सांगितले आहे. यासंदर्भात मुख्य सचिव निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहेत. मंत्री ताबडतोब बाधित जिल्ह्यांमध्ये जातील, असेही ते पुढे म्हणाले.
विद्यमान सदस्यांच्या निवृत्तीमुळे कर्नाटक विधानपरिषदेसाठी 20 स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून 25 जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक, 10 डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुक आचारसंहिता लागू झाली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दबावामुळे राज्याच्या दक्षिण आणि उत्तरेकडील अंतर्गत आणि किनारी भागात अनपेक्षित, अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे, असे नमूद करून बोम्माई म्हणाले की, गेल्या काही दिवसांत अंतर्गत भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे, पिकांची नासधूस असून जोडणारे रस्ते आणि पूल आणि काही ठिकाणी जीवितहानी झाल्याच्या बातम्या आहेत.
ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान, जिल्हा प्रशासनांना सर्व बाधित प्रदेशातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सततच्या पावसामुळे काही भागात सर्वेक्षण करणे कठीण झाले होते, याकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री म्हणाले, जिथे पाऊस कमी झाला आहे तेथे प्राथमिक सर्वेक्षण सुरू झाले आहे आणि पोर्टलवर माहिती अपलोड होत आहे. आज संध्याकाळपासून आम्ही अहवाल तपासू व आवश्यक निधीवर अधिकार्‍यांशी चर्चा करू. त्यानंतर भरपाई जाहीर केली जाईल.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसात तीन लाख शेतकर्‍यांची पिके गेली होती आणि सरकारने आधीच नुकसान भरपाई जाहीर केली आहे, ते म्हणाले की, 130 कोटी रुपये प्रलंबित आहेत आणि त्यांनी डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे त्वरित वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मी यापूर्वीच बंगळुर शहरातील काही पावसाने प्रभावित भागांची पाहणी केली आहे आणि भविष्यातही मी ते करत राहणार आहे. बोम्माई यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, आम्ही बंगळुरची काळजी घेतो. पाऊस कमी झाल्यावर आणि तयारी सुरू झाल्यावर अधिकार्‍यांना प्रकल्प आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. काम युद्धपातळीवर सुरू केले जाईल.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट

Spread the love  शिरूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *