खानापूर : खानापूर तालुक्यातील ढोकेगाळी येथील मराठी शाळची इमारत कोसळली होती. याची माहिती अंजलीताईना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांशी भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व ग्रामस्थांच्या समस्या तातडीने सोडविण्याची ग्वाही दिली.
शाळेची पाहणी करून शाळेची कौले काढून मोडकळीस आलेल्या छताची डागडुजी करून नवीन पत्रे घालण्यासाठी 4 लाख मंजूर केले तसेच शाळेच्या नवीन खोलीच्या मंजुरीचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठविला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या राज्यात आचारसंहिता लागू आहे. 17 जूनला आचारसंहिता संपणार त्यानंतर त्वरित पत्रे घालण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. संबंधित कामाबद्दल पीडिओना देखील सुचना करण्यात आल्या आहेत.
Check Also
“मातृभाषा शाळा अभियान” संदर्भात सर्व भाषिकांची 27 रोजी एकत्रित बैठकीचे आयोजन
Spread the love खानापूर : तालुक्यातील सर्व मातृभाषेच्या सरकारी शाळा टिकवणे व वाचवणे या संदर्भात …