Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

सँट्रो रवी प्रकरणाने राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ

  रवीचा विविध प्रकरणात हात; बड्या नेत्यांशी संबंधाचा आरोप, चौकशीचे आदेश बंगळूर : राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ माजवणाऱ्या सँट्रो रवी प्रकरणाच्या संदर्भात कुमारकृपा गेस्ट हाऊस अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. के. एस. मंजुनाथ उर्फ ​​सँट्रो रवी याच्यावर हुंडाबळीसाठी छळ, फसवणूक आणि अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून …

Read More »

हिंदुत्ववादी नेते श्रीराम सेना जिल्हा अध्यक्ष रवी कोकीतकर यांच्यावर गोळीबार

  बेळगाव : उद्या होणाऱ्या धर्मसभेची तयारी करून आज सायंकाळी हिंडलगा येथील आपल्या घराकडे जात असताना मराठी शाळा हिंडलगा समोर स्पीड ब्रेकरला गाडी स्लो झाल्यानंतर हिंदुत्ववादी नेते हिंदु राष्ट्र सेनेचे नेते आणि श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष रवी कोकीतकर यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केला असून त्या गोळीबारात दोन गोळ्या कोकीतकर यांच्या तोंडाला …

Read More »

कडोलीत उद्या होणार साहित्याचा जागर!

  बेळगाव : कडोली येथील श्री दुरदुंडेश्वर मठाच्या आवारामध्ये कडोली साहित्य संघातर्फे आयोजित ३८ वे साहित्य संमेलन रविवार दि. ०८/०१/२३ रोजी होणार असुन अध्यक्षस्थानी परभणीचे मा. नितीन सावंत असणार आहेत. तर बेळगाव सीमाभागातील कडोली गावामध्ये प्रथम मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होऊन अत्यंत भव्यदिव्य व यशस्वीरीत्या भरवले जाणार आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून …

Read More »

आधी जिंकून तर दाखवा : मंत्री निराणी यांचे आ. बसवनगौडा पाटील यत्नाळ यांना आव्हान

  विजयपूर : आधी निवडणूक जिंकून तर दाखवा असे जाहीर आव्हान उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांनी आज आ. बसवनगौडा पाटील यत्नाळ यांना दिले. विजयपुरात आज शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री मुरगेश निराणी म्हणाले की, लिंगैक्य सिद्धेश्वर श्रींच्या भूमीत राहून त्यांचा सरळ साधा प्रवचन ऎकुनही त्यांच्यात कोणताही बदल झालेला दिसत नाही. …

Read More »

मतदार यादीतून देखील मराठीला हद्दपार!

  बेळगाव : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून यावेळी देखील मराठीला हद्दपार करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडे विचारणा केली असता अद्याप मराठी मतदारयादीची छपाई झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात मराठी भाषिक मतदार आहेत. त्यापैकी बेळगांव ग्रामीण, उत्तर, दक्षिण, खानापूर तसेच निपाणी मतदारसंघात मराठी भाषिक मतदारांची संख्या जास्त …

Read More »

खानापूर भाजपच्या वतीने विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर यांचा वाढदिवस साजरा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने भाजप नेते विठ्ठलराव सोमान्ना हलगेकर यांचा ६१ वा वाढदिवस भाजप कार्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल होते. यावेळी भाजप नेते किरण यळ्ळूरकर, राजेंद्र रायका, जोतिबा रोमानी, वासंती बडगेर, सौ. देसाई, वसंत देसाई, आप्पया कोडोली, लक्ष्मण बामणे, …

Read More »

गुंजीत श्रमदानातून रस्ता दुरुस्त; युवकांचा स्तुत्य उपक्रम

  खानापूर : गुंजी ता. खानापूर येथे पावसाळ्यात रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहून मधोमध कालवा पडला होता. त्यामुळे दुचाकी बरोबरच चार चाकी वाहनेही रस्त्यावरून चालवणे दुरापास्त झाले होते. गुंजी येथील रेल्वे टेशन रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती त्यामुळे या रस्त्यावरून नागरिकांना वाहन चालविणे अत्यंत धोक्याचे व त्रासदायक बनले होते. हा …

Read More »

चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लबच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

  १४ वर्षाखालील खेळाडू :१२ संघांचा सहभाग निपाणी (वार्ता) : येथील चॅलेंजर स्पोर्टस् अँड युथ क्लब व समर्थ व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता. ७) डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी व धनंजय मानवी यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत १२ संघांचा समावेश असून ही स्पर्धा १५ दिवस चालणार …

Read More »

बेळगाव उत्तर भागात उद्या वीजपुरवठा खंडित

    बेळगाव : हेस्कॉमकडून विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी (8 जानेवारी) शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीजपुरवठा ठप्प राहणार आहे. वैभवनगर, न्यू वैभवनगर, बसवकॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसीनगर, उषा कॉलनी, सिद्देश्वरनगर, आंबेडकरनगर, कॉलेजरोड, चन्नम्मा चौक, कोर्ट कंपाऊंड, …

Read More »

बद्रिनाथचे प्रवेशद्वार जोशीमठ खचू लागले.. ; जमिनीला भगदाडे, साडेपाचशेहून अधिक घरांना तडे, सहाशेहून अधिक कुटुंबांचे स्थलांतर

  गोपेश्वर (उत्तराखंड) : चारधामपैकी एक बद्रिनाथचे प्रवेशद्वार असलेल्या जोशीमठ गावात भूस्खलन होऊ लागल्याने पाचशेहून अधिक घरांना तडे गेले आहेत. तेथील अतिधोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या ५० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून ६०० कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शुक्रवारी रात्री दिले. जोशीमठ गावातील रस्त्यांना गुरुवारपासून मोठमोठ्या भेगा …

Read More »