Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

सौंदलगा येथील कचरा प्रकल्पाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

  सौंदलगा : सौंदलगा ग्रामपंचायतमार्फत बांधण्यात आलेल्या कचरा प्रकल्पाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झालेबद्दल सौंदलगा ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्याकडून ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार अर्जाचे निवेदन देण्यात आले आले आहे. सौंदलगाव ग्रामपंचायतीमार्फत एन. आर. जी. फंडातून या कचरा प्रकल्पासाठी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये हा …

Read More »

काळ्या दिनी मराठी भाषिकांची भव्य सायकल फेरी!

  बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांनी काळ्या दिनाच्या निषेधार्थ भव्य सायकल फेरी व निषेध फेरीतून मराठीची ताकत दाखवून दिली. हजारोंच्या संख्येने सीमा बांधव, समितीच्या रणरागिणी या निषेध फेरीत सहभागी झाल्या होत्या. 1956 साली भाषावार प्रांतरचना करण्यात आली व मराठी बहुभाषिक असलेला सीमाभाग तत्कालीन म्हैसूर प्रांतात विलीन करण्यात आला. तेव्हापासून मराठी …

Read More »

सकल मराठा परिवारातर्फे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  सीमाप्रश्न पंतप्रधानांनी सोडविण्याची मागणी! कोल्हापूर : भाषावार प्रांत रचनेनंतर गेली ६० वर्षे प्रलंबित असलेला महाराष्ट्राच्या – कर्नाटक सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून सीमा भागातील गावांचा समावेश महाराष्ट्रमध्ये करावा, यासाठी सकल मराठा परिवार कोल्हापूर मार्फत निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना निवेदन देण्यात. गेली …

Read More »

मराठी भाषिकांवरील अन्यायाचा खानापूर समितीकडून जाहीर निषेध!

  खानापूर : एक नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण व निषेध सभा आयोजित करण्यात आली. शिवस्मारक येथे माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. लाक्षणिक उपोषणाला तालुक्यातील समितीप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ सीमासत्याग्रही नारायण लाड, पुंडलिक मामा चव्हाण, शंकर …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता?

  कोल्हापूर : गेली अनेक दशकं प्रलंबित असलेला बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्र-कर्नाटक वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुचनेनुसार सीमाभागातल्या प्रश्नाबाबत 4 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात होणाऱ्या बैठकीला दोन्ही राज्यांचे राज्यपाल, तसंच सीमाभागातल्या दोन्ही राज्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी …

Read More »

चिकोडी जिल्हा काँग्रेस विधानसभा क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसची भरारी

चिकोडी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे : पत्रकार बैठकीत माहिती निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्हा मतदार संघातील रायबाग विधानसभा मतदारसंघात १४ पैकी १३ जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. तर एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागले, अशी माहिती चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी निपाणी विश्रामधाम येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. …

Read More »

”जोहर- ए- गुफ्तार”चे संपादक फारूक हन्नन यांचे निधन

  बेळगाव (प्रतिनिधी) : जोहर- ए -गुफ्तार या उर्दू वृत्तपत्राचे संस्थापक -संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार तसेच माजी नगरसेवक फारूक हन्नन यांचे आज मंगळवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी ते वय 67 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. फारुख हनन्न …

Read More »

काळ्यादिनी निपाणी कडकडीत बंद

शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त : उघड्यावर सभा घेण्यास मज्जाव निपाणी (वार्ता) : सीमाभागातील मराठी बांधवावर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या सीमावासीयांना पाठींबा व मराठी बांधवावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध म्हणून  मंगळवारी (ता.१) सीमाभागातील मराठी बांधवांनी बंद पाळला. या बंदला निपाणी शहरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी बांधवांनी आपले दैनदिन व्यवसाय बंद ठेवून बंदला …

Read More »

सीमाप्रश्नाच्या अखेरच्या लढ्यात तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

प्रा. डॉ. अच्युत माने : काळ्यादिनी मराठी भाषकांची बैठक निपाणी (वार्ता) : सीमाप्रश्नासाठी सनादशीर मार्गाने लढा देत असताना प्रशासकीय यंत्रणे कडून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. घटनेनुसार सर्व भाषकांना बोलण्याचा अधिकार असूनही दडपशाही केली जात आहे. आतापर्यंत मराठी भाषिकांच्या तीन पिढ्या सीमा प्रश्नासाठी बरबाद झाल्या आहेत. सीमाभागातील मराठी भाषिकांची गेल्या …

Read More »

कर्नाटक सीमारेषेवर शिवसैनिकांची पुन्हा अडवणूक

विजय देवणे परत महाराष्ट्रात : शिवसैनिकांना कर्नाटक प्रवेश बंदी कोगनोळी : एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा राज्योउत्सव तर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक लोकांचा काळा दिन म्हणून साजरा करतात. जिल्ह्यातील मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी जवळच असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात कर्नाटकात जाण्यासाठी येतात. पण कर्नाटक प्रशासनाकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर …

Read More »