Thursday , September 19 2024
Breaking News

Belgaum Varta

निपाणी तालुक्यासाठी स्वतंत्र 10 हजार लसीची शिफारस

मंत्री शशिकला जोल्ले : दहावी परीक्षेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना लसीकरण निपाणी : कोरोना रोखण्यासाठी आरोग्य खाते पोलीस प्रशासन अंगणवाडी व अशा कार्यकर्त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्यामुळेच निपाणी तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यामध्ये लहान मुलांना धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर …

Read More »

शेतकरी रस्ते योजना कागदावरच; शेतकऱ्यांसाठी रस्ते दुरुस्त करण्यात अनास्था

बेळगाव : सोमवारी सकाळी शेतकरी संघटनेची बैठक समर्थ नगर येथील पाटील राईस मिल येथे संपन्न झाली. यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले पक्के रस्ते मिळावेत, रस्त्यांवरील उगवलेले रान व चिखल काढून रस्त्याचे मजबुतीकरण करावे असे सर्वानुमते सुचविण्यात आले. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण …

Read More »

मनपासमोर नवा लाल-पिवळा लावण्याचा कन्नडीगांचा प्रयत्न

बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर कन्नड ध्वजस्तंभ 28 डिसेंबर 2020 रोजी स्थापित करण्यात आला होता. गेल्या सहा महिन्यांपासून ऊन, वारा आणि पावसामुळे फाटलेला ध्वज बदलण्याची मागणी होत आहे. जुना ध्वज काढून नवीन ध्वज लावण्याचा प्रयत्न कन्नड संघटनेचे कार्यकर्ते करत असताना पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला. बेळगाव महानगर पालिकासमोर काही महिन्यांपूर्वी स्थापित …

Read More »

झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांनी बनवली विज्ञान मॉडेल!

भंगार साहित्याचा वापर : लॉकडाऊन काळाचा सदुपयोगनिपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना संसर्गामुळे उद्योग, व्यवसायाबरोबर शाळाही बंद राहिल्या. या काळात अनेकांनी विविध छंद जोपासले. मात्र निपाणी शहरातील आंदोलननगर, शाहूनगर परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षकांच्या सहकार्याने भंगार साहित्यातून अनेक प्रकारची विज्ञान मॉडेल बनवले आहेत. आश्रय नगरमधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ही किमया …

Read More »

रयत मोर्चाच्यावतीने देवलती येथे वृक्षारोपण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील देवलती येथील गावच्या डोंगरावर रयत मोर्चाच्यावतीने वृक्षारोपण सोमवारी साजरा करण्यात आला.यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष यांच्याहस्ते झाडे लावण्यात आली.कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रत्येकाच्या हस्ते रोप लागवड करण्यात आली.यावेळी जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, गुंडू तोपिनकट्टी, विठ्ठल हलगेकर, सुरेश देसाई, अशोक देसाई, सदानंद होसुरकर, रयत मोर्चा अध्यक्ष प्रकाश …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा

खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी पार पडलेल्या खानापूर नगरपंचायतीच्या मासीक बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापूरी होते.यावेळी तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यानी बैठकीला उपस्थित दर्शविली.प्रारंभी नगरपंचायतीच्या वतीने आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार केला.यावेळी बैठकीत नगरपंचायतीच्या दुर्गानगर भागातील वाजपेयी काॅलनीत …

Read More »

म्हाळेवाडी येथे नागरिकांचे लसीकरण मोहिम संपन्न

तेऊरवाडी (एस.के. पाटील) : म्हाळेवाडी ता. चंदगड येथे कोविड -१९ पासून गावाला मुक्त करण्यासाठी नागरिकांचे लसीकरण मोहिम… आमदार राजेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली.सध्या सुरु असलेल्या शेतीच्या कामांची धावपळ व लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होणारी लोकांची गर्दी पाहता म्हाळेवाडीचे सरपंच सी. ए. पाटील यांनी आपल्या गावातच नागरिकांना …

Read More »

महाराष्ट्र विधानसभेत धक्काबुक्की; भाजपचे 12 आमदार वर्षभरासाठी निलंबित

मुंबई : तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदाराचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं आहे. या कारवाईनंतर विरोधी पक्षानं पावसाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी झाली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक भिडले. …

Read More »

राष्ट्रीय पक्षांकडून खानापूर-रामनगर रस्त्याचे श्रेय लाटल्याचा प्रयत्न

खानापूर म. ए. युवा समितीचा आरोप खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-रामनगर रस्त्याचे काम रखडल्याने मे महिन्यातच या रस्त्याचे फोटो व छायाचित्रण करून खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना या रस्त्यासंदर्भात निवेदन सादर केले. व त्याचे लक्ष वेधुन घेतले. लागलीच तालुक्यातील राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी याचे त्रेय …

Read More »

कपिलेश्वर मंदिर भाविकांसाठी झाले खुले!

बेळगाव : कोरोना संकट आटोक्यात आल्याने राज्य सरकारने अनलॉक ३.० जारी करत अनेक निर्बंध उठवले आहे. त्यानुसार बेळगावातील ‘दक्षिण काशी‘ म्हणून ओळखले जाणारे कपिलेश्वर मंदिर सोमवारपासून भाविकांसाठी खुले केले आहे. दुकाने, व्यापारी आस्थापनांना रात्री ९ वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी देतानाच सरकारने भाविकांना दर्शनासाठी मंदिरेही खुली केली आहेत. त्यानुसार कोविड मार्गसूचीचे पालन …

Read More »