Wednesday , December 10 2025
Breaking News

महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी समन्वय राखा : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची सूचना

Spread the love

बेळगाव : नजीकच्या काळात पावसामुळे शेजारील महाराष्ट्रातील जलाशयातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या राज्यातील संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क ठेवणे आवश्यक आहे. याबाबत बेळगाव जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना पर्जन्यमान, जलसाठा आणि इतर बाबींच्या माहितीची सतत देवाणघेवाण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्या आहेत.

संभाव्य पूर व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीसंदर्भात आज शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी आपल्या सूचना दिल्या.
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, यावर्षी एक आठवडा आधीच पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शेजारील महाराष्ट्र राज्याच्या अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील पर्जन्यमान आणि जलाशय पातळीच्या डेटाची दररोज देवाणघेवाण व्हायला हवी. बेळगाव जिल्ह्याला माहिती शिवाय पाणी सोडू नका, असे निर्देश शेजारील राज्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेजारच्या महाराष्ट्रातील पाटबंधारे विभागाशी सतत देखरेख आणि समन्वय साधण्यासाठी कार्यवाही करणे आवश्यक आहे.
जेव्हा पावसाचे प्रमाण जास्त असते, तेव्हा रस्त्यावरील अडथळे तात्काळ दूर करण्यासाठी कृती करावी. पावसाळ्याच्या सुरूवातीस अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या आणि पूरग्रस्त गावांना भेटी देऊन गावातील घरांच्या स्थितीचे योग्य सर्वेक्षण करावे. निकषांनुसार आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.कृषी व फलोत्पादन विभागाने या पिकाचे संयुक्त सर्वेक्षण करून अचूक अहवाल द्यावा, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. पिकाचा अचूक अहवाल देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वन आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी विजयपुरा जिल्ह्याबद्दल माहिती दिली.

जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. यामध्ये 1 घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर 193 घरे अंशत: कोसळली आहेत. ३० हेक्टर शेतजमीन आणि १५.३ हेक्टर फळबाग लागवडीखाली असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगया, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *