बेळगाव : वडगाव येथील आनंदनगर, संभाजीनगर परिसरात गटारी नसल्यामुळे तसेच गटाराची सफाई केली नसल्यामुळे पावसाचे पाणी या परिसरातील घरामध्ये शिरले आहे. आनंदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी फोटो आणि व्हिडीओमार्फत येथील परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. आनंदनगर, संभाजीनगर अन्नपूर्णेश्वरी नगर, केशवनगर आदी भागातील नागरिकांनी वेळोवेळी ही समस्या स्थानिक लोकप्रतिनिधीना निदर्शनास आणून देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. पावसाळ्यापूर्वी या भागातील नागरिक लोकप्रतिनिधींकडे आपली समस्या मांडतात मात्र लोकप्रतिनिधी आश्वासन देऊन या भागातील नागरिकांची बोळवण करतात. देशात अव्वल आलेली स्मार्टसिटी खरोखर स्मार्ट होणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta