Tuesday , September 17 2024
Breaking News

बेळगावात ७८ वा जिल्हा स्वातंत्र्यदिन साजरा; जिल्हा क्रीडांगणावर लक्षवेधी परेड

Spread the love

 

बेळगाव : ब्रिटीश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७८ वर्षे झाली आहेत. आज ७८ वा स्वातंत्र्यदिन बेळगाव जिल्हास्तरावर मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. बेळगाव शहरातील नेहरू स्टेडियमवर बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतासह तिरंगा ध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी महापौर सविता कांबळे, खासदार जगदीश शेट्टर, उत्तरचे आमदार आसिफ सेठ, जिल्हा आयुक्त मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग, पोलीस महानिरीक्षक विकासकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भीमा शंकर गुळेद , विविध विभागांचे अधिकारी अधिकारी, मंचावर उपस्थित होते.नंतर प्रमुख पाहुणे, जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी खुल्या वाहनातून परेडचे निरीक्षण केले. पोलीस, अग्निशमन दल, एनसीसीसह विविध पथके या पथ संचालनात सहभागी झाले होते. नंतर सतीश जारकीहोळी यांनी मानवंदना स्वीकारली. दिल्लीच्या राजपथावर काढण्यात आलेल्या परेडप्रमाणे अतिशय आकर्षक अशा या परेडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांचे स्मरण करून जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी ७८व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आता आपला देश सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. आपल्या देशाचा जीडीपी ७.३ टक्क्यांनी वाढला आहे. अन्नधान्याचे उत्पादन ३२.९६ दशलक्ष ओलांडले आणि साठा वाढला. त्याबद्दल शेतकऱ्यांचे मनःपूर्वक आभार. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोकाभिमुख योजना दिली आहे.

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, बेळगाव येथे १९२४ मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. गुरुवारी बेळगाव जिल्हा स्टेडियमवर ७८ वा स्वातंत्र्य ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. शक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात दररोज ५.४० लाख लोक प्रवास करत आहेत. भूकमुक्त कर्नाटक हे आमच्या सरकारचे मुख्य ध्येय आहे. अन्नभाग्य योजना यशस्वीपणे सुरू आहे, असे ते म्हणाले. बेळगावात ९.९३.५४७ लोक गृहज्योतीचा लाभ घेत आहेत. ११.८७.५६९ लोकांना गृहलक्ष्मी योजना, घरमालकांना २००० मिळत आहेत. यावेळी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून, युवा निधी योजनेसाठी ११ हजार ३६५ तरुणांनी अर्ज केल्याचे त्यांनी सांगितले. पावसामुळे नुकसान झालेल्या घरांना भरपाई देण्यात आली असून ५ पूरग्रस्त तालुक्यांमध्ये ३० काळजी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत
त्यानंतर ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि विविध क्षेत्रातील कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *