Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

विणकरांसाठी पॅकेज मंजूरमुळे मंत्री पाटील यांचा अथणी येथे सत्कार

निपाणी : कोरोना महामारीमुळे देशातील अनेक उद्योगधंदे आणि व्यवसाय बंद पडले आहेत. कर्नाटक राज्यातील वस्त्रोद्योगावर अवलंबून असलेल्या अनेक विणकरांना आर्थिक मदतीची आवश्यकता भासत होती. यासाठी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये ३५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे व प्रत्येक विणकरांना ३ हजार रुपये आर्थिक मदत मंजूर केली आहे, अशी माहिती कर्नाटक राज्याचे वस्त्रोद्योग …

Read More »

खानापूरच्या दुर्गम भागात वन टच फौंडेशनतर्फे मदत

खानापूर : गोरगरीब गरजू लोकांना निस्वार्थपणे मदत करण्यात अग्रेसर असलेल्या बेळगावच्या वन टच फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बेटणे, गवळीवाडा, पारवाड, गवळीवाडा या दुर्लक्षित खेडेगावांमध्ये ‘एक हात मदतीचा’ ब्रीदवाक्याला अनुसरून जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली. जूना गुडसशेड रोड बेळगाव वन टच फौंडेशन या संस्थेच्या पुढाकारातून बेळगाव पासून 55 कि. …

Read More »

शनिवार, रविवार कोल्हापुरात कडक लॉकडाऊन; हे राहणार सुरु, हे बंद

कोल्हापूर : जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढीचा दर १७.९६ टक्के आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार जिल्हा चौथ्या स्तरामध्ये आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार दरम्यान ठराविक वेळेत सुरू असणारे खेळ, चित्रीकरण, दुकाने, व्यायामशाळा, ब्युटी पार्लरस, स्पा, केशकर्तनालय, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, सायकलिंग शनिवार आणि रविवारी बंद राहतील. यासंदर्भातील आदेश जिल्हा प्रशासनाने …

Read More »

बेळगावसह 11 जिल्ह्यात लॉकडाऊन २१ जूनपर्यंत वाढवला

बेंगळुरू : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी राज्यातील बेळगावसह 11 जिल्ह्यातील लॉकडाऊन वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि पालकमत्र्यांना दिल्या आहेत. कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग अजुनही कमी झाला नसल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याच्या सूचना दिल्या मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे चर्चा केली.मागील लॉकडाऊन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध …

Read More »

बैलूर विभागात कायमस्वरूपी लाईनमनची नेमणूक करा, अन्यायकारक वीजदरवाढ मागे घ्या

खानापूर युवा समितीची हेस्कॉमकडे मागणी खानापूर : राज्य सरकारने लागू केलेले अन्यायकारक वीजदरवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी. तसेच बैलुर परिसरात सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, कायमस्वरूपी लाईनमनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे केली.गुरुवारी दिलेल्या निवेदनात, बैलूर परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित करण्यात …

Read More »

लग्नाचा रौप्यमहोत्सवी वाढदिवस आणि त्यांनी जपली सामाजिक बांधिलकी……

बेळगाव : चर्मकार समाजाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रीपाद बेटगिरी आणि त्यांच्या पत्नी निलम बेटगिरी यांनी काल गुरुवारी आपल्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस स्तुत्य उपक्रमासह साजरा केला. सामाजिक बांधिलकीचे ध्यान राखून बेटगेरी दाम्पत्याने सिद्धार्थ बोर्डिंग येथील गरीबांसोबत आपल्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला. त्याचबरोबर लग्नाच्या रौप्यमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने सिद्धार्थ बोर्डिंगला …

Read More »

बापट गल्लीतील नवहिंद युवक मंडळाच्यावतीने गरजूंना रेशन किटचे वाटप

बेळगाव : बापट गल्ली येथील नवहिंद युवक मंडळाच्यावतीने तसेच बेळगांव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शहरातील 60 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरीत करण्यात आले.लॉकडाऊनमुळे अनेकजण आर्थिक अडचणीत आले आहे. अशा कुटूंबाची महिती घेऊन आज मंडळाच्यावतीने किटचे वाटप करण्यात आले. यावेळी खडेबाजार पोलीस ठाण्याचे फौजदार आर. बी. सौदागर व त्यांचे सहकारी …

Read More »

कर्नाटक: कुठल्याही धर्माला दुसऱ्या धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार नाही – उच्च न्यायालय

बेंगळुरू : कोणत्याही एका धर्मावर विश्वास ठेवावा म्हणून इतर धर्मांना कमी लेखण्याचा अधिकार कुठल्याही धर्माला नाही, असं मत कर्नाटक उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. कोणत्याही धर्माच्या प्रमुखांनी, धर्माच्या कीर्तनकार किंवा प्रवचनकारांनी दुसऱ्या कोणत्याही धर्मांची अवहेलना करु नये असं न्यायमूर्ती एच. पी. संदेश यांनी सांगितलं. दरम्यान आपल्या धर्माबद्दल सांगत असताना इतर …

Read More »

कर्नाटक: राज्य सरकारने तौक्ते चक्रीवादळाने २०९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा वर्तविला अंदाज

बेंगळुरू : कर्नाटक सरकारने तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वंकष सर्वेक्षण केले असून अंदाजे २०९.३० कोटी इतके नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला आहे. केंद्राला दिलेल्या निवेदनात, राज्य सरकारने चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची यादी दिली असून त्यामध्ये १,०४७ कि.मी. रस्ते, समुद्र-क्षरण संरक्षण भिंती, ४७३ घरे, ७१ शासकीय इमारती, २९ छोटी सिंचन योजना, ७९ …

Read More »

16 जूनला मोर्चा नाही तर मूक आंदोलन; संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : येत्या १६ जूनला राजर्षी छत्रपती शाहू स्मारक समाधी परिसरात मोर्चा नाही तर मूक आंदोलन होणार असून मंत्री, खासदार व आमदारांनी मराठा आरक्षणासाठी नक्की काय करणार याची ठोस भूमिका तेथे जाहीर करावी, असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले. १६ जूनला दहा ते एक या वेळेत …

Read More »