Tuesday , September 17 2024
Breaking News

मुख्य बातमी

गोव्यात निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर आघाडी कामय राहील : संजय राऊत

पणजी (वार्ता) : गोव्यात काँग्रेसबरोबर निवडणूकपूर्व युती झाली नसली तरी निवडणुकीनंतर शिवसेनेला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला जरी यश मिळाल्यास त्यांच्याबरोबर आघाडी ही कायम राहील, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार व गोव्याचे निवडणूक प्रभारी संजय राऊत यांनी काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी आघाडीविषयी दिल्लीत केलेल्या वक्तव्यावर बोलताना सांगितले. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीची …

Read More »

बिहारमध्ये ’एनटीपीसी’ परीक्षार्थींचा उद्रेक, अनेक ठिकाणी रेल रोको, दगडफेक

नवी दिल्ली : रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी)च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘एनटीपीसी’ परीक्षा निकालात घोटाळा झाल्याचा आरोप करत परीक्षार्थींनी केला होता. हा निकाल रद्द करा अशी मागणी करत शेकडो परीक्षार्थींनी बिहारमध्ये बक्सर, मुजफ्फरपूर, नालंदा, नवादा, सीतामढी आणि आरामध्ये रेल रोको आंदोलन केले. पश्चिम गुमटीजवळ सासाराम-आरा पॅसेंजरला आग लावली. पोलिसांवर दगडफेकही केली. …

Read More »

पर्येतून प्रतापसिंह राणे निवडणूक लढवणार?

पणजी : काँग्रसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी आज (सोमवारी) सकाळी भूमिका देवीचे दर्शन घेतले. पत्नी विजयादेवी यांच्यासोबत त्यांनी मंदिरात देवीला नारळ ठेवला. त्यांच्या या देवदर्शनानंतर सध्या राज्यात ते निवडणूक लढवणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. संध्याकाळी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. पर्ये मतदारसंघातून प्रतापसिंह …

Read More »

दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर अपक्ष उमेदवार

पणजी: दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी आज अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पणजी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने शुक्रवारी उत्पल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी ३४ उमेदवारांची पहिली यादी …

Read More »

बाधितांच्या डिस्चार्ज धोरणात बदल!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती नवी दिल्ली : देशातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीनंतर कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांच्या डिस्चार्ज धोरणात बदल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतून दिली. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या संसर्गग्रस्तांना …

Read More »

उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला

नवी दिल्ली : गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी (दि.8) केली. या राज्यांतील निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान मतदान होईल. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारी …

Read More »

पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटींबाबत सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला महत्वाचे आदेश

नवी दिल्ली : पंजाब दौर्‍यादरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटीं प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. दरम्यान, पंजाब पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना त्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. पंजाब सरकारने स्थापन केलेल्या समितीवरही सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. …

Read More »

साखर कारखान्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखर विकास निधी अधिनियम,1983 अंतर्गत पुनर्रचना करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दोन वर्षांची सवलत आणि पाच वर्षात कर्जफेड करण्याच्या तरतुदीमुळे, एसडीएफ कर्ज घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल साखर कारखान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता त्यामुळे केंद्राने वर्तवली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु, व्यावसायिक क्षमता असलेल्या आणि ज्यांनी साखर …

Read More »

गोव्यात निगेटिव्ह अहवाल अथवा लसीकरणाची सक्ती

पणजी (वार्ता) : गोवा राज्यातील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी किंवा पार्ट्यांना हजेरी लावताना प्रत्येकाला कोरोना निगेटिव्ह अहवाल किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी स्पष्ट केले. ख्रिसमस आणि न्यू इयर हंगामातील पर्यटन व्यवसाय लक्षात घेऊन गोवा सरकारने किनारपट्टीवरील राज्यांमध्ये तूर्तास …

Read More »

तेलंगणा – छत्तीसगड सीमेवर चकमक; सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

रायपुर : सोमवार दि. 27 डिसेंबर रोजी पहाटे तेलंगणा आणि छत्तीसगड सीमा भागातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील पेसलपाडू जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली उसुन या चकमकीत 6 नक्षलवाद्यांना यम सदनी धाडण्यास सुरक्षा दलांना यश आले आहे. भद्राद्री कोठागुडेम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. …

Read More »