खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव-पणजी महामार्ग रोखून ठिय्या आंदोलन करण्यात आले. रामनगर-खानापूर रस्ता हा खड्डेमय झाला आहे. वेळोवेळी मागणी करून देखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. दि.7 जुलै रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे तहसीलदारांना …
Read More »प्रदूषणकारी एसबीओएफ खत कारखाना बंद करण्याची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंजिनकोडल गावाजवळ असलेल्या साविओ बायो ऑरगॅनिक अँड फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड (एसबीओएफ) या खत कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्याकरिता हा कारखाना बंद करण्यात यावा आशा मागणीचे निवेदन नंजिनकोडल, दोड्डेबैल आणि सागरे ग्रामस्थांनी हलशी आणि नंजिनकोडल ग्राम पंचायतींना सादर केले. …
Read More »खराब रस्त्यामुळे गंगवाळी शाळेच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारासाठी करावा लागला 1 कि. मी. प्रवास
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने खानापूर-लोंढा महामार्गावरील गंगवाळी (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता अतिशय खराब झाल्याने मध्यान्ह आहाराचे वाहन शाळेपर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच चक्क 1 किलोमीटरहून जास्त अंतर कापत माध्यान्ह आहार आणावा लागला. याची दखल घेत खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष …
Read More »कस्तुरीरंगन आयोगाच्या शिफारशीसंदर्भात खानापूर म. ए. समितीच्या बैठकीत चर्चा
खानापूर – रामनगर रस्त्यासाठी रुमेवाडी क्रॉस येथे उद्या रास्तारोको करण्याचा निर्धार खानापूर : रविवार दिनांक 17-7-2022 रोजी दुपारी 12 वाजता खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शिवस्मारक खानापूर येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील होते. यावेळी 6 जुलै 2022 रोजी कस्तुरीरंगन आयोगाने खानापूर तालुक्यातील 60 गावे …
Read More »सातनाळी, माचाळी गावच्या पुलावर चार फुट पाणी, गावाला बेटाचे स्वरूप
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लोंढ्याजवळ असलेल्या सातनाळी, माचाळी गावाला पांढऱ्या नदीच्या पुलाचा धोका दरवर्षी भेडसावितो. नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने पांढऱ्या नदीला पुर आला. आणि सातनाळी, माचाळी गावाला जोडलेल्या पुलावर चार फुट पाणी येऊन गावचा संपर्क तुटला. सातत्याने असे प्रसंग सातनाळी, माचाळी गावच्या नागरिकांना सतावत असतात. याकडे संबंधित तालुक्याच्या …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीची व्यापक बैठक उद्या
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक रविवार दि. 17 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्यासह खानापूर तालुक्यातील 60 गावांचा समावेश कस्तुरीरंगन अहवालात समावेश केला आहे. यापूर्वी देखील महाराष्ट्र एकीकरण समितीने कस्तुरीरंगन अहवालाला विरोध केला होता. मात्र केंद्र सरकारने हा विरोध …
Read More »ईदलहोंड मराठी शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : ईदलहोंड (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक अशोक रामचंद्र पाटील हे 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे माजी आमदार श्री. दिगंबरराव यशवंतराव पाटील होते. यावेळी व्यासपीठावर एसडीएमसी अध्यक्ष तानाजी पाखरे, उपाध्यक्षा …
Read More »गर्लगुंजीत मराठी मुलांच्या कोसळलेल्या शाळा इमारतीची जिल्हा न्यायाधीशांकडून पाहणी
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ८५ वर्षा पूर्वी बांधण्यात आलेल्या मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीच्या तीन वर्गखोल्या नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाल्या. ही बातमी कळताच बेळगाव जिल्हा न्यायाधीश मुरली मोहन रेड्डी, बीईओ लक्षणराव यकुंडी, खानापूर तालुका न्यायाधीश सूर्यनारायण, खानापूर तालुका वकिल संघटना अध्यक्ष ऍड. आय. आर. घाडी, …
Read More »खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस, कबनाळीत घराची भिंत कोसळून लाखाचे नुकसान
खानापूर : खानापूर तालुका हा अति पाऊसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यातच अति जंगलाने वेढलेला तालुका आहे. अशा खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या आठवड्यापासुन धुवाधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील कबनाळी गावात जुन्या व मातीच्या घराची भिंत कोसळून राजू महाजिक या गरीब शेतकऱ्यांचे लाखोचे …
Read More »खानापूर तालुक्यात घराची भिंत कोसळून मुलाचा मृत्यू
खानापुर : गेल्या आठवडाभरापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खानापुर तालुक्यातील लिंगनमठ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चुंचवाड गावातील अनंतू धर्मेंद्र पाशेट्टी (१५) या मुलाचा मृत्यू झाला आहे. घराशेजारील घरात तो गायी बांधत असे. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास गोठ्यात गायी चारण्यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta