Tuesday , March 3 2026
Breaking News

महाराष्ट्र

विषबाधेने दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत..

  कोल्हापूर जिल्ह्यातील घटना कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या कारणामुळे दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुरगूडमध्ये दोन चिमुकल्यांचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला तर करवीर तालुक्यातील मांडरे गावात दोन सख्या भावांचा अंत झाला आहे. मांडरेतील दोन भावांच्या वडिलांचाही पंधरा दिवसांपूर्वी विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. या …

Read More »

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची होणार नियुक्ती; नवनिर्वाचित आमदारांना देणार शपथ

    मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्ष यांना शपथ देणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आज हंगामी अध्यक्ष म्हणून राजभावनात जाऊन शपथ घेणार …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; शिंदे-अजितदादा उपमुख्यमंत्री

  मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्रचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ …

Read More »

देवेंद्र फडणवीसच भाजपचे विधिमंडळ पक्षनेते; कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

  मुंबई : मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. भाजपचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर …

Read More »

महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू

  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकीरण समितीच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक सरकार आणि बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास परवानगी द्यावी अन्यथा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करुन कर्नाटकातील वाहनांना अडवण्याचा इशारा दिला. याबाबचे निवेदन …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे बाबा आढाव यांनी उपोषण सोडले

  पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर काही दिग्गज नेत्यांनी थेट ईव्हीएम मशीन आणि निवडणुकांवर संशय व्यक्त केला. तर दुसरीकडे या निवडणुकीत पैशांचा भरपूर वापर करण्यात आल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी आरोप केला. त्यानंतर ईव्हीएम मशीन आणि निवडणुकीवर संशय व्यक्त करत समाजसेवक बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलना सुरुवात केली. गेल्या …

Read More »

महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला

  मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. भाजपने या निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे बोलले जात आहे. काल अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र …

Read More »

शिवशाही बसचा भीषण अपघात; १५ प्रवासी ठार

  गोंदिया : शिवशाही बस उलटून १५ प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ घडली. या घटनेत २० ते २५ प्रवासी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवारी …

Read More »

मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब; एकनाथ शिंदेंचा गृहमंत्रिपदासह तब्बल 12 मंत्रि‍पदावर दावा

    नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदावरुन रंगलेले राजकारण संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता काल (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते उपस्थितीत होते. या बैठकीत मुख्यमंत्री …

Read More »

कृष्णा नदीच्या पुलावरून कार कोसळून तिघांचा मृत्यू

  सांगली / संजयनगर: कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावर उदगाव येथे पुलावरून चारचाकी गाडी खाली कोसळून भीषण अपघात झाला. अपघातात तीन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सांगलीच्या गावभागातील प्रसाद खेडेकर, त्यांच्या पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर आणि वैष्णवी संतोष नार्वेकर अशी मृतांची नावे आहेत. तर समरजीत प्रसाद …

Read More »