Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

म. ए. युवा समितीच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापूर येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून ध्येयमंत्र म्हणण्यात आले.यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, अश्वजित चौधरी, इंद्रजित धामणेकर, विक्रांत लाड, आकाश भेकणे, विकास …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने वृक्षारोपण

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे वृक्षारोपण करून 21000 वृक्ष लागवड संकल्पाची सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड विलगिकरण केंद्राच्या सुरूवातीला बेळगावसह तालुक्यात 21000 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला होता त्यानुसार आज हिंडलगा हुतात्मा स्मारक येथे आज वृक्षारोपण करून संकल्पाची सुरूवात करण्यात आली.यावेळी शुभम शेळके यांनी …

Read More »

झाडाला गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

बेळगाव : मानसिक तणावातून मनस्थिती बिघडल्यामुळे मजगाव येथील एका इसमाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मजगाव नजीकच्या येळ्ळूर शिवारात आज सकाळी उघडकीस आली. नेमिनाथ सातगौडा पुजारी (वय 45 वर्षे, रा. पुजारी गल्ली, मजगाव) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नांव आहे. नेमिनाथ याची पत्नी त्याला सोडून गेली असून त्याच्या पश्चात आई …

Read More »

कर्नाटकात येणाऱ्यांसाठी आरटी -पीसीआर अनिवार्य

बेळगाव : महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात रस्ते अथवा रेल्वे मार्गाने येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह आरटी -पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी मात्र याची गरज नाही. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वाहनांनी अथवा रेल्वेने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह आरटी -पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी ही …

Read More »

विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला मोठा झटका! ९ हजारांपेक्षा जास्त संपत्ती बँकांकडे हस्तांतरित

नवी दिल्ली: देशातील अनेक बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेल्या उद्योजक विजय माल्या, हिरेव्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना मोठा झटका बसला आहे. कारण या तिघांच्याही हजारो कोटींची संपत्ती बँकांनी हस्तांतरित केली आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांची मिळून तब्बल 9,371 कोटी रुपयांच्या मालमत्ता …

Read More »

ऑनर किलिंग; प्रेमी युगुलाचा संशयास्पद मृत्यु

विजापूर : विजापूर जिल्ह्यातील सलाहळ्ळी (ता. देवरहिप्परगी) एकमेकांच्या गावाशेजारी राहणाऱ्या प्रेमी युगुलाचा संशयास्पद मृत्यू झाला असून खून करण्यात आला असल्याचा आरोप घरच्यांनी केला आहे. आंतरजातीय तरुणाशी प्रेम केल्याच्या कारणातून अल्पवयीन मुलीसह तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना सलादहळ्ळी येथे घडली. रिक्षाचालक बसवराज बडगेरी (वय 19, रा. सलादहळ्ळी) असे खून …

Read More »

५१ ग्रा. पं. ना कचरा डेपो; मात्र नागरिकांतून नाराजी

खानापूर (प्रतिनिधी) : जिल्हा पंचायतीच्या आदेशानुसार खानापूर तालुक्यातील जवळपास ५१ ग्राम पंचायतीना कचरा डेपो उभारण्याची सुचना जिल्हा पंचायत अधिकारीवर्गाने दिला आहे.मात्र ग्रामीण भागात अनेक समस्या असुन कित्येक ग्राम पंचायतीना सरकरी जागा नाही, गावठान नाही, जागेची समस्या भेडसावित असताना कचरा डेपो सक्तिने उभा करू असा दबाव अधिकारी वर्गाने सुरू केला.तालुक्यातील जास्तीत …

Read More »

बंदर, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी खा. मंगला अंगडी

बेळगाव : बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांची बंदर, जहाज आणि जल मार्ग मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयातून त्यांना या निवडीचे पत्र पाठवण्यात आले आहे. आपल्यावर विश्वास ठेवून आपली या पदी निवड करण्यात आली असून आपण वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवू, असे आपल्या निवडीबद्दल बोलताना …

Read More »

सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी – आमदार अनिल बेनके

बेळगाव : पावसामुळे भातशेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार अनिल बेनके, कृषिप्रधान आर. बी. नाईकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि डी. बी. पाटील यांच्या द्रोण कॅमेऱ्याच्या सहाय्याने बुधवारी सकाळी पाहणी करण्यात आली आहे. मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले …

Read More »

खानापूर स्टेट बँकेबाबत ग्राहकातून नाराजी

खानापूर (प्रतिनिधी) : संपूर्ण देशात सध्या कोरोनाच्या माहामारीत जनतेला अनेक समस्याना तोंड द्यावे लागते आहे. असे असताना खानापूर स्टेट बँकेच्या कर्मचारी वर्गाकडून बॅंक व्यवहारासाठी पास बुकावर बारकोडची सक्ती केल्याने अनेक ग्राहकांच्या पास बुकावर बारकोड नाही. अशाना स्टेट बँकेला दोन महिन्यापासून हेलपाटे मारावे लागत आहे.मात्र याची दखल स्टेट बँकेच्या व्यवस्थापकानी घेतली …

Read More »