Thursday , September 19 2024
Breaking News

खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर सदैव कटिबद्ध : काँग्रेस नेते महादेव कोळी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर सदैव कटिबद्ध आहेत. भारतीय जनता पार्टीसारखे गलिच्छ राजकारण काँग्रेस पक्ष कधीच करत नाही. आम्ही नेहमी सत्याच्याच बाजूने असतो, असे काँग्रेस नेते महादेव कोळी म्हणाले.
कर्नाटकात भाजपाचे सरकार असताना तालुक्याच्या आमदार म्हणून डॉ. अंजलीताई निंबाळकर या विकास कामे राबवीत असताना. भाजप नेत्यांनी वेळोवेळी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. उदाहरण द्यायचे झाल्यास खानापूरचे नवीन बस स्थानक असो किंवा जांबोटी- आमटे येथील मुलींच्या शाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम. भाजपा नेत्यांनी यात देखील राजकारण आणले. परंतु सध्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे आणि आपण खानापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार. डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या खानापूर हायटेक बस स्थानकाच्या उद्घाटनला राज्याचे परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी १२ जुलै रोजी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे डॉ. अंजलीताई आमदार असताना खानापूरच्या जनरल हॉस्पिटलसाठी १०० बेडच्या नवीन इमारत उभारणीसाठी ३१.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मागील आठवड्यात राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांची माजी आमदार डॉ.अंजलीताई निंबाळकर यांनी भेट घेतली आणि खानापूर येथील १०० बेडच्या जनरल हॉस्पिटलसंदर्भात आठवण करून दिली आणि कालच कॅबिनेटमध्ये खानापूरच्या १०० बेडच्या जनरल हॉस्पिटलसाठीला मंजुरी मिळाली असून लवकरात लवकर हे काम सुरु होणार असल्याचे महादेव कोळी म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, आपण नेहमीच खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. मागच्या आठवड्यात आम्ही पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन लिंगनमठ रोड करण्यासाठीचे निवेदन दिले असून सार्वजनिक बांधकाम मंत्री लवकरच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतील, असेही महादेव कोळी मिळाले. तालुक्यात सध्या जी कामे सुरू आहेत किंवा यापुढे देखील वर्षभरात ज्या ज्या कामांची उद्घाटने होती ती सर्व कामे माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेली आहेत. मागील वर्षभरात विद्यमान आमदारांनी एकही नवीन काम रस्ता, पूल, इमारत तालुक्यासाठी मंजूर करून आणली नाही. ही बाब खेदजनक आहे. डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी आपल्या कार्यकाळात खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. यापुढे देखील त्या खानापूर तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील असतील यात तिळमात्र शंका नाही, असे महादेव कोळी म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचा लिंटल भरणी कार्यक्रम संपन्न

Spread the love  खानापूर : मणतुर्गे तालुका खानापूर येथील श्री रवळनाथ मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यासाठी १४/०९/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *