Wednesday , December 10 2025
Breaking News

वीज कोसळून खानापूर तालुक्यातील बेटगिरी येथील महिला ठार…

Spread the love

खानापूर : बेटगिरी येथील सौ. मनिषा दत्तू गुरव (वय 42) यांचा अंगावर वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला. आज शनिवारी वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला. यावेळी मनिषा काजू वेचत होत्या. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांना गंभीर अवस्थेत बेळगावच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले; परंतू तेथील डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी तातडीने खानापूर येथून पोलिसांना सोबत घेऊन बेळगावला धाव घेतली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *