खानापूर : शुक्रवार दिनांक 3 रोजी मणतुर्गा (ता.खानापूर) येथे आयोजित करण्यात आलेली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची दुसरी निर्धार सभा काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आली.
शुक्रवार दिनांक 3 रोजी सभेच्या काही वेळापूर्वी ज्येष्ठ समिती कार्यकर्त्याच्या वाहनाचा अपघात झाल्याने ही सभा समिती नेत्यांनी सर्वानुमते रद्द केली. पुढील निर्णय सर्वांच्या विचार विनिमयातून घेण्यात येईल. कार्यकर्त्यांनी संभ्रमात न राहाता चळवळीचे कार्य सुरू ठेवावे, असे माजी आ. दिगंबर पाटील आणि ज्येष्ठ नेते देवाप्पा गुरव यांनी कळविले आहे.
Check Also
“मातृभाषा शाळा अभियान” संदर्भात सर्व भाषिकांची 27 रोजी एकत्रित बैठकीचे आयोजन
Spread the love खानापूर : तालुक्यातील सर्व मातृभाषेच्या सरकारी शाळा टिकवणे व वाचवणे या संदर्भात …