कोल्हापूर : मित्रांसमवेत पार्टी करून कोल्हापूरकडे परतणाऱ्या तरुणांच्या मोटारीला कोल्हापूर जवळील पुईखडी घाटात भीषण अपघात होऊन दोन तरुण जागीच ठार झाले तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. शुभम हेमंत सोनार (24 राहणार राजारामपुरी) आणि शंतनु शिरीष कुलकर्णी (वय 28 राहणार मोरेवाडी तालुका करवीर) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
सौरभ रवींद्र कणसे (वय 26 राहणार पिंपळेश्वर गणपती मंदिराजवळ राजारामपुरी) कोल्हापूर संकेत बाळकृष्ण कडणे (21 राहणार खाडिलकर गल्ली सांगली) याच्यासह आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
Check Also
डॉ. तारा भवाळकर या प्रागतिक स्त्रीवादी संशोधक, साहित्यिक
Spread the love कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे गौरवोद्गार; विद्यापीठाच्या वतीने केला सत्कार कोल्हापूर : …