Tuesday , September 17 2024
Breaking News

नागरिकांच्या पाण्यापेक्षा गंगा पूजनाची गडबड

Spread the love

 

विलास गाडीवड्डर यांचे टीकास्त्र : काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपला केले लक्ष

निपाणी (वार्ता) : आपल्या नगराध्यक्षासह नगरसेवक काळात तलावातील पाणी पातळी कमी होऊनही शहर उपनगराला सुरळीत पाणीपुरवठा केला होता. पण गेल्या दोन वर्षापासून नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. असे असताना यंदा तलाव भरला असून गंगा पूजन करण्यात स्थानिक व वरिष्ठ नेते मंडळी गुंतले आहेत. त्यामुळे गंगापूजन पेक्षा शहरवासीयांना सुरळीत पाणी द्या, असे टीका नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी केली. रविवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
गाडीवड्डर म्हणाले, पाण्यासह वीजपुरवठा, घंटागाडी, वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून निपाणी शहरातील नागरिक पाण्याअभावी हैराण झाले आहेत. शहराला सुरळीत पाणीपुरवठा करणे गरजेचे असताना भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते इर्षेचे राजकारण करत आहेत.
गेली २४ वर्षे नगरसेवक म्हणून काम करत असताना आतापर्यंतचा अनुभव आणि या महिन्यातील अनुभव वेगळा आहे. गेली अनेक वर्षे वर्षे काँग्रेसचे सरकार होते. मात्र तेव्हापेक्षा आता काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना सत्तेचा गर्व आला आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता नसताना कोणताही नेता कार्यकर्त्यांच्या पाठीशी नव्हता. गावागावातील कार्यकर्ते स्वतःच आपली लढाई लढले. मात्र आता राज्यात लोकसभा निवडणुकीतील मताधिक्याचा नेत्यांना झाला गर्व आला आहे.
लोकसभेला निपाणी ३० हजाराचे मताधिक्य मिळाले. हे चांगला उमेदवार होता म्हणून मिळाले असताना स्थानिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आपणामुळेच मताधिक्य मिळाल्याचे सांगत आहेत. यातून खासदार आणि पालकमंत्र्यांची दिशाभूल होत आहे. नेते अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गुंतले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून पालकमंत्र्यांची दिशाभूल केली जात आहे. पालकमंत्र्यांनीही स्वतःचा पक्ष वाढवायचा की दत्तक पक्ष वाढवायचा? याचा विचार करावा, असे आवाहनही गाडीवड्डर यांनी केले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, डॉ. जसराज गिरे उपस्थित होते.
——————————————————————–
समस्याबाबत बैठक बोलवा
लोकसभा निवडणुकीपूर्वी पालकमंत्र्यांना निपाणी शहरासाठी नव्या तलावाचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी सदर योजना राबवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर तीन महिने उलटले तरी कोणतेच प्रयत्न झालेले नाहीत. निपाणीच्या पाणीप्रश्नावर खासदार, आमदारांनी ३० नगरसेवकांसह व्यापक बैठक बोलवावी, असेही गाडीवड्डर यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *