Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

सीमावासियांचा बुलंद आवाज आझाद मैदानावर घुमला!

  बेळगाव : गेल्या 66 वर्षापासून कर्नाटकाच्या जोखंड्यात अडकलेल्या सीमाभाग जोपर्यंत महाराष्ट्रात विलीन होत नाही, तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होत नाही. सीमाभागातील नागरिकांना कर्नाटक सरकारच्या कानडी सक्तीच्या वरवंट्याखाली वागाव लागत आहे, या जुलमी अन्याय अत्याचाराविरुद्ध गेली 66 वर्ष सीमा भागातील मराठी भाषिक लोकशाहीच्या मार्गाने लढत आहे. या मराठी भाषिकांची …

Read More »

डॉ. मुळे यांचे एसएसएएफला सहकार्य, मदतीचे आश्वासन

  बेळगाव :सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या (एसएसएएफ) सीईओ प्रेमा पाटील यांनी आज मंगळवारी मराठा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. जी. मुळे यांची सदिच्छा भेट घेतली. बेळगाव सर्किट हाऊस येथील या भेटीप्रसंगी डॉ. एम. जी. मुळे यांच्यासोबत एसएसएएफच्या सीईओ प्रेमा पाटील यांची बैठक झाली. या संपूर्ण बैठकीदरम्यान डॉ. मुळे यांनी सुरेंद्र …

Read More »

अजित दादा आणि रोहित पवार होणार आझाद मैदानावरील धरणे आंदोलनात सहभागी होणार

  बेळगाव : बेळगाव सीमा प्रश्नाबाबत मंगळवारी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या धरणे आंदोलनाच्या पूर्व संध्येला समितीचे युवा नेते आणि राष्ट्रवादी इंजिनियर्स सेल राज्य समन्वयक अमित देसाई यांनी महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी गट नेते अजितदादा पवार आणि आमदार रोहित पवार यांची देवगिरी बंगल्यात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. आज आझाद मैदानावर …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठी भाषेची “ऍलर्जी”

  बेळगाव : बेळगावमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. ज्या भागात सर्वाधिक मराठी भाषिक राहतात, त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा “रोड शो” आयोजित करण्यात आला होता. मोदींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी उसळली. मोदींनीही गाडीतून बाहेर हात दाखवत नागरिकांना अभिवादन केलं. पण, पंतप्रधान …

Read More »

स्वातंत्र्य लढ्यात आणि उत्कर्षात बेळगावचे अतुलनीय योगदान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  बेळगाव : बेळगावची भूमी एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. या ठिकाणी वीर राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतीवीर संगोळी रायण्णा सारख्या पराक्रमी व्यक्ती जन्मल्या. देशाच्या स्वातंत्र्य आणि उत्कर्षात बेळगावची महत्त्वपूर्ण भूमिका आहे असे सांगताना स्वातंत्र्य लढ्यात आणि उत्कर्षात बेळगावचे अतुलनीय योगदान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. येडीयुराप्पा रोडवरील मालिनी सिटी येथे …

Read More »

“चलो मुंबई” धडक मोर्चाला ग्रामीणचे कार्यकर्ते रवाना

  बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने “चलो मुंबई”चा नारा दिल्यामुळे आज सीमा भागातील शेकडो सीमावासीय रेल्वेच्या सहाय्याने मुंबईकडे कुच करत आहेत. सोमवार दिनांक 27 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बेळगाव रेल्वे स्थानकावर असंख्य सीमावासीय भगव्या झेंड्यासह आले होते. यावेळी बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, खानापूर, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच …

Read More »

सीमावासीय मुंबईकडे रवाना

बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे अशा गगनभेदी घोषणा देत हजारो सीमावासीयांनी मुंबईकडे रवाना झाले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने मंगळवारी (दि. 28) पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज (सोमवार) सीमावासीय मुंबईकडे …

Read More »

बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल सोसायटीचा सुवर्णमहोत्सवी सोहळा थाटात

  बेळगाव : संस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांच्यातील उत्तम समन्वय, संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून दिली जाणारी उत्तम ग्राहक सेवा यामुळे बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने विश्वासार्हता प्राप्त केली असून याच बळावर या सोसायटीने लावलेल्या इवल्याशा रोपाचे रूपांतर प्रचंड अशा वटवृक्षात झालेले आहे, असे …

Read More »

हासनजवळ अपघातात एकाच कुटूंबातील चार ठार

  बंगळूर : चन्नरायपटण तालुक्यातील करेहळ्ळीजवळ रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक बसल्याने दोन मुलींसह एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. योगेशचारी (३५), लक्ष्मी (२८) आणि लोकेशच्या बहीणीच्या मुले, गणवी (१२) आणि लेखना (४) अशी मृतांची नावे आहेत. योगेशचारी हे मूळचे तिपातुरु तालुक्यातील एडगरहळ्ळी गावचे असून …

Read More »

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ग्रेस मार्क्स

कोविडच्या परिणामातून विद्यार्थी सावरले नसल्याने निर्णय बंगळूर : मार्च-एप्रिल २०२२-२३ मध्ये होणार्‍या दहावी (एसएसएलसी) आणि बारावी (द्वितीय पीयूसी) वार्षिक परीक्षा लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने एक गोड बातमी दिली आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स (कृपांक) मिळतील. गेल्या वर्षी कोविडमुळे दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते. असेच …

Read More »