Wednesday , April 8 2026
Breaking News

LOCAL NEWS

रिंगरोड विरोधात शेतकऱ्यांच्या एकीची वज्रमूठ

रिंगरोड रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन बेळगाव : देशोधडीला लावणाऱ्या बेळगावातील प्रस्तावित रिंगरोडच्या बांधकामाला शहरासह, तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. बेळगावच्या आसपासच्या परिसरात सुपीक जमीन आहे. या जमिनीत वर्षभरात तीन वेळा पिके घेऊन शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. यापूर्वीही सुवर्ण विधानसौध व हलगा-मच्छे बायपाससाठी शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन गमावली आहे. आता …

Read More »

भारतीय मुस्लिम फोरमतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

  बेळगाव : शहरातील भारतीय मुस्लिम सोशल अँड इकॉनोमिक डेव्हलपमेंट फोरम बेळगावतर्फे विविध मागण्यांची निवेदनं आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली. भारतीय मुस्लिम सोशल अँड इकॉनोमिक डेव्हलपमेंट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. अलीकडेच गेल्या 26 नोव्हेंबर …

Read More »

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाचे संजय राऊत यांना समन्स

  बेळगाव : संजय राऊत यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे. तसेच त्यांना 1 डिसेंबरला न्यायालयात हजार राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहे. बेळगावात 30 मार्च 2018 रोजी केलेल्या भाषण प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. बेळगाव कोर्टाने पाठवलेलं समन्स आणि त्यावेळी केलेल्या भाषणावर संजय राऊत …

Read More »

बेळगावात भीषण अपघातांची मालिका; 3 कार उलटून लॉरीला धडक

  बेळगाव : बेळगावात अपघातांची भीषण मालिका घडली असून, तीन कार दुभाजकाला धडकून एका लॉरीवर आदळून पलटी झाल्याची घटना वंटमुरी घाटाजवळ घडली. बंगळुरू-पुणे राष्ट्रीय महामार्ग 4 वर हा अपघात झाला. या अपघातात 7 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातांच्या मालिकेमुळे महामार्गावर …

Read More »

बेळगावचा दौरा करण्याबाबत सीमा समन्वयक मंत्र्यांना मध्यवर्तीचे पत्र

  बेळगाव : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या सीमाप्रश्नी उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराजे देसाई या दोघांची सीमा समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या दोघांनाही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पत्र लिहून बेळगाव दौरा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी विनंती वजा मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात असलेल्या …

Read More »

संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप

  बेळगाव : संविधान दिनाच्या औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने सरकारी उच्च प्राथमिक शाळा नंबर 9 केळकरबाग बेळगाव येथील शाळेमध्ये एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. प्रथमता मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन …

Read More »

जन्मदात्या आई-बापाला केलं पोरानं बेघर : समाजसेविकेचा आधार

  बेळगाव : महाराष्ट्रातून आलेले सांगोला जिल्ह्यातील डिस्कळ गावातील जोडपे त्यांना घरातून त्यांचा मुलगा आणि सुनेने घरातून बाहेर काढले आहे त्यानंतर त्या जोडप्याने रेल्वेमधून प्रवास करत बेळगाव गाठले. जोडप्याने बसवेश्वर सर्कल या ठिकाणी आसरा घेतला होता. तेथून जाणाऱ्या विद्यार्थिनीने त्यांना रडत बसलेले पाहून त्यांची विचारपूस करून त्यांना नाश्ता देऊन त्यांचे …

Read More »

तारांगण व एंजल फाउंडेशनतर्फे महिलांसाठी बाईक रॅलीचे आयोजन

  बेळगाव : तारांगण व एंजल फाउंडेशनच्या वतीने बेळगावच्या महिलांसाठी दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. सामाजिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या पुढाकाराने महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. …

Read More »

…म्हणे महाराष्ट्राच्या याचिकेला कायदेशीर मान्यता नाही

  बोम्मईना साक्षात्कार, एकही गाव गमविणार नसल्याचा पुनरुच्चार बंगळूर : महाराष्ट्राने २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला कायदेशीर मान्यता नाही असे सांगून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सांगितले की, यासाठीच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचा दावा कायम ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राची ही मागणी …

Read More »

सीमाप्रश्नी 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी!

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राचे ऑन रेकॉर्ड वकील शिवाजीराव जाधव यांनी शुक्रवारी सीमाप्रश्नी तातडीने सुनावणी घेण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या आनुषंगाने 30 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. कर्नाटकाने …

Read More »