Tuesday , March 3 2026
Breaking News

३ हजार क्युसेक पाणी सोडण्याच्या शिफारशीवर देणार आव्हान : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Spread the love

 

बंगळूर : तामिळनाडूला तीन हजार क्युसेक पाणी सोडण्याच्या कावेरी जल नियंत्रण समितीच्या शिफारशीला आपण सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.
चामराजनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही वकिलांशी चर्चा केली आहे. समितीच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते, असे त्यांनी सुचवले आहे. त्यानुसार आम्ही अपील दाखल केले असे सांगून ते म्हणाले की, आमच्याकडे तामिळनाडूला सोडण्यासाठी पाणी नाही.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर निदर्शने होत आहेत. कन्नड समर्थक संघटनांनी २९ सप्टेंबरला बंद पुकारणार असल्याची घोषणा केली आहे. लोकशाहीत आंदोलनाला परवानगी आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बंद आणि निषेध मोर्चा काढण्यास परवानगी नाही.
चामराजनगरात आलात तर सत्ता गमवावी लागेल, म्हणूने मूर्खपणा आहे. मी प्रमुख झाल्यानंतर प्रथम चामराजनगरला भेट दिली. त्यानंतरही ३० वर्षे जोरदार राज्य केले. माझा अशा मूर्खपणा, अंधश्रद्धेवर विश्वास नाही. चामराजनगर येथे १२ वेळा आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
मलमहाडेश्वर मंदिराच्या सभेसाठी मी येथे भेट दिली, महाडेश्वराचे दर्शन घेतले आणि राज्यात चांगला पाऊस व्हावा आणि जनता व शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. राज्यात पावसाअभावी १९५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे पावसासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री एच. सी. महादेवप्पा, के. व्यंकटेश, स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री या नात्याने महाडेश्वरासमोर पूजाअर्चा केल्यानंतर महाडेश्वर मंदिराच्या विकासासंदर्भातील विविध प्रकल्पांवर चर्चा झाली.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *