Sunday , September 8 2024
Breaking News

तालुक्यात मुसळधार पावसाने घरे कोसळलेल्यांना नुकसानभरपाई द्या

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यात गेल्या १५ दिवसात ५१ घरे पडली. संबंधित नुकसानग्रस्ताना तालुका प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई वेळीच करावी.
यासाठी तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी सरकार दरबारी जोरदार प्रयत्न करावे, अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थातून होत आहे.
तालुक्यातील पडलेली घरे गर्लगुंजी १, हलसी २, मेरडा २, लोंढा ३, कापोली के जी १, तोपीनकट्टी १, मोदेकोप १, इदलहोंड १, हलगा १, झुंजवाड के जी १, गोधोळी १, सन्नहोसुर १, नंदगड १, चापगांव१, लिंगनमठ ३, अवरोळी १, चिक्कमन्नोळी ३, हिरेहट्टीहोळी ७, गाडीकोप १, पारीश्वाड ६, देवलती २, इटगी ६, बोगूर १, प्रभूनगर १, बिडी १, हंदूर १ अशी एकूण ५१ घरे पडली आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल हायस्कूलचे घवघवीत यश

Spread the love    खानापूर : गर्लगुंजी तालुका खानापूर विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *