नवी दिल्ली : लोकसभेनंतर आता राज्यसभेमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधकांवर कारवाई करण्यात आली असून खासदारांचं निलंबन करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनात तृणमूल काँग्रेसच्या सात खासदारांस 19 खासदारांना एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. जीएसटी आणि महागाई यासारख्या अनेक मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. राज्यसभेत हौद्यात उतरून घोषणा दिल्या. राज्यसभा अध्यक्षांनी वारंवार सूचना केल्यानंतरही विरोधकांनी न ऐकल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली. संसदेच्या 256 नियमांचं उल्लंघ केल्याप्रकरणी विरोधकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
खासदार सुष्मिता देव, डॉ. शंतनू सेन आणि डोला सेन यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या सहा खासदारांना आणि इतर पाच खासदारांना आठवड्याभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. जीएसटी, महागाईसह विविध मुद्द्यावर या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली, त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे या खासदारांवर एका आठवड्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दोन दिवसांपासून विरोधकांनी आक्रमकपणे आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जीएसटी आणि महागाईचा समावेश होता. यामध्ये आज गुजरातमधील विषारी दारु प्यायल्यामुळे 28 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणावर राज्यसभेत चर्चा करण्याची मागणी टीएमसीकडून करण्यात आली होती. पण याबाबत चर्चा करण्यास परवानगी न दिल्यामुळे विरोधकांनी आक्रमकपणे आंदोलन केले. सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे 19 खासदारांवर आठवडाभरासाठी निलंबनाची कारवाई केली.
कोणत्या 19 खासदाराचं निलंबन झालं
मौसम नूर, एल. यादव, व्ही. शिवादासन, अबीर बिसेवास, सुष्मिता देव, शांता छेत्री, मोहम्मद अब्दुल्लाह, एए रहीम, कनिमोझी, डॉ. शांतनू सेन, नदीम उल हक, डोला सेन.