Sunday , December 14 2025
Breaking News

Belgaum Varta

कॉ. कृष्णा मेणसे यांना यंदाचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार

  आजरा : गेली 80 वर्षांहून अधिक काळ श्रमिक, कष्टकरी, कामगार शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे आणि बिदर-भालकी, बेळगांव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी आपले आयुष्य वेचणारे कॉ. कृष्णा मेणसे यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना.गव्हाणकर स्मृती पुरस्कार देण्याचा निर्णय आज येथे झालेल्या पुरस्कार व स्मारक समितीच्या बैठकीत …

Read More »

शिवगर्जना महानाट्य खानापूर तालुक्यातील जनतेसाठी पर्वणीच

  खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप व तालुका भाजपच्या वतीने येत्या दि. ७ ते १० जानेवारी रोजी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व लैला शुगर्सचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवगर्जना हा महानाट्य प्रयोग होणार आहे. यानिमित्ताने सोमवारी दि. २ जानेवारी रोजी सकाळी येथील …

Read More »

गॅस गळतीने कसाई गल्लीत घराला आग

  बेळगाव : गॅस गळतीने घराला आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी कसाई गल्ली येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. विनायक बारटक्के व त्यांचे कुटुंबीय भाडोत्री रहात असलेल्या घराला रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास गॅस गळतीने आग लागली. कौलारू घर असल्यामुळे छत …

Read More »

क्रीडा व सांस्कृतिक उद्घघाटन सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  खानापूर : येथील मराठा मंडळ महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाचे उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. नागराजू यादव तसेच प्रमुख पाहूने म्हणून श्री. शिवाजी पाटील व श्री. परशुराम अण्णा गुरव उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या बीए प्रथम सत्रात शिकणाऱ्या कु. मल्लाप्पा करगुप्पी या मुष्ठीयुध्द खेळात विविध स्थरावर आपले …

Read More »

बैलहोंगल येथील अनिगोळ येथे दगडाने ठेचून एकाची हत्या

  बेळगाव : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवार दि. 1 जानेवारी रोजी रात्री बैलहोंगल तालुक्यात एकाचा खून झाल्याची घटना घडली. बैलहोंगल येथून जवळच असलेल्या अनिगोळ येथे एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मंजुनाथ सुंगर (45) याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 25 अजय हिरेमठ हा संशयित आरोपी आहे. मंजुनाथ …

Read More »

नंदगड महात्मा गांधी संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न!

  नंदगड : येथील एनआरई संस्था संचलित महात्मा गांधी संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयात नुकताच वार्षिक क्रीडा स्पर्धा व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. 2022-23 सालाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा विद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. दोन दिवस या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. संस्थेचे चेअरमन श्री. सी. जी. वाली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. प्रारंभी संस्थेचे …

Read More »

निपाणीजवळील तवंदी घाटात चार वाहनांची एकमेकांना धडक

  निपाणी : पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील निपाणीजवळील तवंदी घाटातील अमर हॉटेलसमोरील धोकादायक वळणावर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली आहे. अधिक माहिती अशी, मालवाहतूक ट्रक (एमएच …

Read More »

नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; सर्व याचिका फेटाळल्या

  नवी दिल्ली : केंद्र सरकारनं 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयानं 2016 ची नोटाबंदी वैध ठरवली आहे. यासोबतच न्यायालयानं सर्व 58 याचिकाही फेटाळून लावल्या आहेत. 4 न्यायाधीशांनी बहुमतानं निर्णय दिला आहे. …

Read More »

गद्दारांनी आम्हाला आत्मपरीक्षणाबद्दल सांगू नये, शिंदे गटालाच आत्मपरीक्षणाची गरज : संजय राऊत

  मुंबई : शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहेच, पण त्यांनी आत्मपरीक्षण केल्यास शिवसेना पुन्हा एकसंध झाल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं. केसरकरांच्या या वक्तव्याला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. आम्हाला नाही, तर शिंदे गटालाच आत्मपरीक्षणाची गरज …

Read More »

पुन्हा राज्यात काँग्रेसची सत्ता येणार

माजी मंत्री वीरकुमार पाटील : गायकवाडी, कोडणी येथे बैठक निपाणी (वार्ता) : भाजपाच्या अहंकारी वृत्तीला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक केली जात आहे. गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने देश जोडण्याचे काम  केले आहे.  पक्षाने सर्व सामान्य जनतेच्या हिताची कामे केली. आजच्या युवा पिढीला  ही कामे …

Read More »