Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

सौदलगा हायस्कूलमध्ये वीर पत्नी राणी जाधव यांचा सन्मान

  सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शहीद जवान प्रकाश पुंडलिक जाधव बुध्दिहाळ यांच्या वीर पत्नी श्रीमती राणी प्रकाश जाधव यांचा देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्या निमित्त व विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चेअरमन रघुनाथ चौगुले होते. सुरुवातीला सहायक शिक्षक एस. …

Read More »

स्वातंत्र्याच्या लढ्यातील काँग्रेसचे योगदान जनतेपर्यंत पोहोचवा : केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी

  बेळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भाजप, आरएसएसचे काहीच योगदान नाही. आपण शांत बसलो तर उद्या आपणच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असे मोदी म्हणतील. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे हे लोकांना सांगण्याचे आवाहन केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.75 व्या स्वातंत्र्यदिन अमृत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आक्रमक; शिवसैनिकांचीही धरपकड

  कोल्हापूर : मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. दरम्यान, त्यांच्या दौर्‍याला ठाकरे गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करत होते. शिवसैनिक या ठिकाणी जमू लागल्यानंतर पोलिसांनी संजय पवार यांच्यासह काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौर्‍यात …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर मान्यवरांकडून स्वागत

  कोल्हापूर (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांचे स्वागत …

Read More »

तिरंग्याचा मान वाढवा, राष्ट्रभक्ती जागवा!

  राजू पोवार : अ‍ॅक्सिस बँकेत ’आझादी का अमृत महोत्सव’ निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनाच्या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्याचा योग सर्वांना आला आहे. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणार्‍या क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने ’हर घर …

Read More »

कोगनोळी हायस्कूलवतीने राष्ट्रध्वज जागृत फेरी

  कोगनोळी : येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल व श्री अंबिका आदर्श विद्यालय यांच्यावतीने 75 व्या स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रध्वज जागृत फेरी काढण्यात आली. राष्ट्रध्वज जागृत फेरी अंबिका मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळी गल्ली, मगदूम गल्ली, सुतार गल्ली, लोखंडे गल्ली, मुख्य बस स्टॅन्ड, मेन …

Read More »

सीमाभागाच्या चळवळीत अत्रे यांचे योगदान अविस्मरणीय आहे : प्राचार्य आनंद मेणसे

प्रगतिशील आणि साम्यवादीतर्फे आचार्य अत्रे जयंती सोहळ्या निमित्त व्याख्यानाचे आयोजन बेळगाव : सीमाभागातल्या सीमा प्रश्नांसाठी आमदारकीचा राजीनामा देणारे प्रल्हाद केशव अत्रे तथा आचार्य अत्रे यांचे बेळगावशी असलेले संबंध अतिशय घनिष्ठ आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांचे आहे; संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत यांचे योगदान अविस्मरणीय असून सर्वांना त्यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. मराठी …

Read More »

हर घर तिरंगा अभियानांतर्गत नवहिंद क्रीडा केंद्रांच्या वतीने ध्वजारोहण

  बेळगाव : येळ्ळूर येथील सामाजिक सेवाभावी संस्था नवहिंद क्रीडा केंद्रांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा या शासनाच्या अभियानांतर्गत नवहिंद भवन येळ्ळूर येथे तिरंगा ध्वज नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन श्री. डी. एन. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी बाळू दणकारे यांनी परेड मार्च घेतला. यावेळी नवहिंद …

Read More »

आगळी वेगळी जनसेवा करणारे काद्रोळकर

  खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर शहरातील पोलीस ठाण्यात नेहमीच अपघात, आत्महत्या, खून आशा घटना घडल्या की कोणत्याही वेळी आपली ट्रॅक्स घेऊन सेवेला हजर राहणारे समाजसेवक म्हणून सदानंद तुकाराम काद्रोळकर हे वयाच्या 77 वर्षे आपली सेवा प्रामाणिकपणे करतात. तालुक्यात कुठेही अपघात घडला, कुठेही खून झाला, कुठेही आत्महत्या केलेल्या मृतदेह राहूदे …

Read More »

खानापूर तालुक्यातील दक्षिण भागात गेल्या 8 दिवसापासून वीजपुरवठा खंडित

  खंडित वीजपुरवठ्यामुळे  लोकांचे आरोग्य धोक्यात खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर तालुक्यातील नागरागाळी भागातील अनेक गावांत गेल्या 5 ऑगस्टपासून वादळी पावसामुळे विजेचा पुरवठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे येथील परिसरात लोकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील नागरगाळी, बामनकोप, कृष्णानगर, कुंभार्डा, तारवाड, कोडगई, सुवतवाडी, चिंचेवाडी, मुंडवाड, पिंपळे, मांजरपै, माचाळी, सतानाळी, …

Read More »