Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल याळगी सन्मानित

  बेळगाव : बॅ. नाथ पै फौंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, मुंबई व बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज, कुडाळ यांच्या सहकार्याने अलीकडेच वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात माननीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै जन्मशताब्दी सोहळा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला …

Read More »

बेळगुंदी येथे काळ्या दिनाबाबत जनजागृती

  बेळगाव : आज दि. १३ रोजी बेळगुंदी येथे समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर काळा-दिनसंदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची ठरलेली रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केले‌. सदर जागृतीपर बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार श्री. मनोहर किणेकर, …

Read More »

अबनाळी गावाला सीसी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि जंगल भागातील शिरोली ग्राम पंचायत हद्दीतील अबनाळी गावाला माजी एमएलसी महांतेश कवटगीमठ यांनी आपल्या फंडातून अबनाळी गावासाठी सीसी रोड साठी निधी मंजूर केला. त्या कामाचा शुभारंभ गुरूवारी दि. १३ रोजी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या शुभहस्ते कुदळ मारून करण्यात आला. यावेळी …

Read More »

काळ्या दिनाच्या जागृतीसाठी खानापूर तालुक्यातील गावोगावी संपर्क दौरे

  खानापूर (प्रतिनिधी) : १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जाण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक गावातून गावोगावी दौरे काढून काळ्यादिनी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्यासाठी लागलीच संपर्क दौऱ्याला प्रारंभ करू, असे मत माजी आमदार दिगंबर पाटील यांनी शिवस्मारक सभागृहात बोलाविलेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून …

Read More »

उच्च न्यायालयाने बीएमसीला खडसावले; ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश

  मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उद्या सकाळी ११ पर्यंत याबाबतचे पत्र लटके यांना देण्यात यावं असं न्यायालयाने म्हटलं आहे. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावलं असून तुमच्याकडे विशेषाधिकार …

Read More »

भाषा वाचली तरच संस्कृती टिकेल : आबासाहेब दळवी

नागुर्डा येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम खानापूर : हल्ली गावागावात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. आपली संस्कृती टिकविण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालली आहे. पण भाषा वाचली तरच संस्कृती टिकेल, याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे. येत्या काळात भाषा संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन या लढ्याला पाठबळ द्यावे, असे आवाहन म.ए. समिती नेते …

Read More »

पावसाच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

  बेळगाव : पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या देखरेख करून घरांच्या नुकसानीच्या नोंदी करून घ्याव्यात जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. आपत्ती व्यवस्थापन आयुक्तांना घराच्या नुकसानीसंदर्भात अतिरिक्त भरपाईचे वितरण करण्यासाठी परिपत्रक जारी करण्याचे …

Read More »

काळ्यादिनीसंदर्भात समितीकडून गावोगावी जनजागृती

  बेळगाव : दि.१२ रोजी कुद्रेमनी येथे समस्त गावकऱ्यांना, युवा तरुणांना १ नोव्हेंबर म्हणजेच ‘काळा-दिन’ या संदर्भात जागृत करून, केंद्र सरकारच्या निषेधार्थ निघणाऱ्या फेरीची रुपरेषा जाहीर करून बहुसंख्येने काळ्या-दिनाच्या फेरीत सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते गावोगावी जाऊन करत आहेत. सदर जागृतीपर कार्यक्रमाला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आमदार …

Read More »

अरविंद केजरीवाल नोव्हेंबरमध्ये बेळगावात

  बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात राज्यातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढील महिन्यात बेळगावला भेट देणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर राव यांनी दिली आहे. बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भ्रष्टाचारात …

Read More »

चन्नराज हट्टीहोळी यांचा उड्डाणपूल उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार

  बेळगाव : केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी बुधवारी बेळगावात आयोजित केलेल्या तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपूल उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. रेल्वे विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांकडे दुर्लक्ष करून शिष्टाचाराचा भंग केला. या पार्श्वभूमीवर मी …

Read More »