बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून बळ्ळारी नाला विकास न झाल्याने परिसरातील शेतकरी पीकं घेण्यासंदर्भात अत्यंत अडचणीत आहेत. सरकार दरबारी वेळोवेळी मोर्चे, निवेदनं देऊन आजपर्यंत आश्वासनाशिवाय कांहीच झाले नाही. त्याचबरोबर पीकाऊ जमिनीत चाललेली बेकायदेशीर कामं तात्काळ बंद करुन शेती शाबूत राहावी तसेच शेतीविषयक इतर विषयासंबंधी परिसरातील सर्व शेतकरी बधूंची बैठक श्री ज्ञानेश्वर मंदीर. राजवाडा कंपाऊंड, वडगाव,बेळगाव येथे शुक्रवार दि. 27/3/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित केली आहे. तेंव्हा सर्व शेतकरी बधूंनी मोठ्या संखेने हजर राहून चर्चेत भाग घ्यावा असे परिसरातील शेतकरी संघटनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta