Sunday , December 14 2025
Breaking News

राज्य अक्षरदासोह समितीतर्फे विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Spread the love

 

बेळगाव (वार्ता) : अक्षरदासोह योजना सुरू झाल्यापासून मुलांची शैक्षणिक सुधारणा, बालकांची गैरहजेरी रोखणे, कुपोषण रोखणे, १ लाख १७ हजार महिलांनी गरम अन्न शिजवून ५८ लाख ३९ हजार गरीब विद्यार्थ्यांना दूध दिले आहे. शिक्षण विभागाच्या शासकीय व अनुदानित शाळांमध्ये हे काम सुरू असून योजनेतील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त निधी पगारवाढ यासह विविध मागण्यांचे निवेदन अक्षरदासोह जिल्हा समितीतर्फे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

निवेदनातील अधिक माहिती अशी, दिवसात ४ तासांपेक्षा जास्त काम केल्याबद्दल त्यांच्या मेहनतीची दखल घेऊन किमान वेतन निश्चित करण्यात यावे. कर्मचाऱ्यांना पूर्णपणे शिक्षण विभागाच्या जबाबदारीत आणून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. अतिरिक्त निधी सुरू करावा. २०२३ च्या अर्थसंकल्पात मागील सरकारने मानधनात वाढ केली. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. दरवाढीचा आधार घेऊन १२ हजारांची पगारवाढ द्यावी. अक्षरदासोहाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये फक्त ४ तास काम आहे. पण तो रोज ६ तास काम केले जाते. त्यामुळे मार्गदर्शक नियमावलीत ६ तास काम म्हणून सुधारणा करावी.
सेवानिवृत्त व सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना १ लाख नुकसान भरपाईचे आदेश द्यावेत. मुख्य स्वयंपाकीकडे संयुक्त खात्याची जबाबदारी देण्याबाबत शाळेचे मुख्याध्यापक आणि मुख्य स्वयंपाकी यांनी हाताळली आहे. प्रकल्पाचा एक भाग म्हणून मुख्य स्वयंपाकी या विभागाच्या जबाबदारीखाली काम करत होते. मात्र अलीकडेच मुख्य स्वयंपाकी कर्मचाऱ्यांचे अधिकार काढून घेत ही जबाबदारी मुख्याध्यापकाकडून एसडीएमसी समिती अध्यक्षांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यांना पूर्वीप्रमाणे कर्तव्य बजावू द्यावे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या स्वयंपाकींच्या कुटुंबीयांना नोकऱ्या द्याव्यात, प्रकल्पासाठी अनेक वर्षांपासून सुविधांशिवाय काम केले आहे. अशा महिलांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ही नोकरी देण्याचे आदेश महिलांना द्यावेत. उन्हाळी व दसरा सुट्टीच्या वेतनाबाबत, शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या शिक्षकांना एप्रिल-मे महिन्याचे वेतन दिले जाते, परंतु अर्धा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या या महिलांना एप्रिल-मे महिन्याचे वेतन दिले जात नाही. दसऱ्याची सुट्टी (ऑक्टोबर) महिन्याचा पगारही दिला जात नाही. हा पगार देण्यात यावा.
अक्षरदासोह योजना कोणत्याही खाजगी संस्थांना देऊ नये. या योजनेच्या कोणत्याही स्वरूपाची जबाबदारी खाजगी संस्थांना न देता ती शासनाच्या अंतर्गत व्यवस्थापित केली जावी. प्रत्येक शाळेत किमान २ स्वयंपाकी असावेत, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर अक्षरदासोह जिल्हा समितीचे अध्यक्ष एल. एस. नायक, खजिनदार तुळसम्मा माळदकर, सेक्रेटरी जे. एम. जैनेखान, सुमन गडाद, पार्वती कौजलगी, सुनिता बाळनावर, देवकी हुक्केरी, भारती जोगनावर यांची नावे आणि सह्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *